शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

पवारांच्या काटेवाडीची लक्षवेधी निवडणूक, बिनविरोध करण्यास काका-पुतण्यांना अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 21:19 IST

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपा व रासप पुरस्कृत पॅनल सत्ताधा-यांच्या विरोधात उभा आहे. सरपंच पदासाठी तीन जण स्पर्धेत असून यात एक तृतीय पंथीयाचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजपाबरोबर रासपने उडी घेतल्याने जाीय समीकरंडही महत्वाची ठरणार आहेत. राज्याच्या राजकारणावर प्रभाव असणा-या नेत्याच्या गावातच ही निवडणूक होत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

काटेवाडीत गेल्यावेळी निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने सुनित्रा पवार यांनी ती निवडणूक बिनविरोध केली होती. यावर्षी मात्र सरपंचपद थेट जनतेतून व सर्वसधारण गटासाठी असल्याने निवडणुकीत चुरश निर्माण झाली आहे. राज्यात व केंद्रात भाजपा सत्तेत असल्याने येथील भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले पॅनल रिंगणात उतरवले आहे. त्यात अजित पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न न केल्याने निवडणूक लागली आहे.  राष्ट्रवादीचे भवानीमाता पॅनल व भाजपा व रासपचे  लोकशाही ग्रामविकास पॅनलमध्ये ही लढत होत असली तरी सरपंचपदासाठी तिहेरी लढत होत आहे. सुनिता गायकवाड या तृतीय पंथीयाने सरपंचपदासाठी व वार्ड क्रमांक ३ मधून सदस्यपदासाठी रिंगनात आहे. संरपचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

विरोधकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लादली

राष्ट्रवादीचा भवानीमाता पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार विद्याधर काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की काही जणांनी स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणूक लादली आहे. काटेवाडीचा परिपूर्ण विकास झाला आहे. काटेवाडीला राज्यात निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. त्यावरूनच गावातील विकासकामांचा अंदाज करणे शक्य आहे. गावातील संपूर्ण विकासकामे पूर्ण आहेत. तरीदेखील विरोधक बिनबुडाचे आरोप करतात. त्यामुळे जनतेतून विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव दिला नाही. विरोधकांनी केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लादली आहे. शिवसेनेनेदेखील राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. 

हस्तकांमार्फत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न झाला... 

लोकशाही ग्रामविकास पॅनलचे प्रमुख, सरपंचपदाचे उमेदवार पांडुरंग कचरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की बिनविरोध निवडणुकीमुळे एक प्रकारे लोकशाहीचा खूनच होतो. दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे तंत्र विरोधक राबवितात. निवडणुकीमुळे प्रस्थापितांना सर्वसामान्यांच्या दारात जावे लागले. हेच आमच्या पॅनलचे घोषवाक्य आहे. काटेवाडीची भरभराट झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात दीपनगर, मासाळवाडी भागात स्मशानभूमी नाही. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही. रस्त्याचे नामोनिशाण नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या हस्तकांमार्फत बिनविरोध निवडणुक ीचा प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला. मात्र,  तो प्रस्ताव आम्ही स्वीकारला नाही. बिनविरोध निवडणुकीला संमती दिल्यास केवळ १ ते २ जागांवर बोळवण करून चेष्टा केली जाते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार