शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पवारांच्या काटेवाडीची लक्षवेधी निवडणूक, बिनविरोध करण्यास काका-पुतण्यांना अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 21:19 IST

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपा व रासप पुरस्कृत पॅनल सत्ताधा-यांच्या विरोधात उभा आहे. सरपंच पदासाठी तीन जण स्पर्धेत असून यात एक तृतीय पंथीयाचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजपाबरोबर रासपने उडी घेतल्याने जाीय समीकरंडही महत्वाची ठरणार आहेत. राज्याच्या राजकारणावर प्रभाव असणा-या नेत्याच्या गावातच ही निवडणूक होत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

काटेवाडीत गेल्यावेळी निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने सुनित्रा पवार यांनी ती निवडणूक बिनविरोध केली होती. यावर्षी मात्र सरपंचपद थेट जनतेतून व सर्वसधारण गटासाठी असल्याने निवडणुकीत चुरश निर्माण झाली आहे. राज्यात व केंद्रात भाजपा सत्तेत असल्याने येथील भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले पॅनल रिंगणात उतरवले आहे. त्यात अजित पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न न केल्याने निवडणूक लागली आहे.  राष्ट्रवादीचे भवानीमाता पॅनल व भाजपा व रासपचे  लोकशाही ग्रामविकास पॅनलमध्ये ही लढत होत असली तरी सरपंचपदासाठी तिहेरी लढत होत आहे. सुनिता गायकवाड या तृतीय पंथीयाने सरपंचपदासाठी व वार्ड क्रमांक ३ मधून सदस्यपदासाठी रिंगनात आहे. संरपचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

विरोधकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लादली

राष्ट्रवादीचा भवानीमाता पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार विद्याधर काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की काही जणांनी स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणूक लादली आहे. काटेवाडीचा परिपूर्ण विकास झाला आहे. काटेवाडीला राज्यात निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. त्यावरूनच गावातील विकासकामांचा अंदाज करणे शक्य आहे. गावातील संपूर्ण विकासकामे पूर्ण आहेत. तरीदेखील विरोधक बिनबुडाचे आरोप करतात. त्यामुळे जनतेतून विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव दिला नाही. विरोधकांनी केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लादली आहे. शिवसेनेनेदेखील राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. 

हस्तकांमार्फत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न झाला... 

लोकशाही ग्रामविकास पॅनलचे प्रमुख, सरपंचपदाचे उमेदवार पांडुरंग कचरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की बिनविरोध निवडणुकीमुळे एक प्रकारे लोकशाहीचा खूनच होतो. दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे तंत्र विरोधक राबवितात. निवडणुकीमुळे प्रस्थापितांना सर्वसामान्यांच्या दारात जावे लागले. हेच आमच्या पॅनलचे घोषवाक्य आहे. काटेवाडीची भरभराट झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात दीपनगर, मासाळवाडी भागात स्मशानभूमी नाही. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही. रस्त्याचे नामोनिशाण नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या हस्तकांमार्फत बिनविरोध निवडणुक ीचा प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला. मात्र,  तो प्रस्ताव आम्ही स्वीकारला नाही. बिनविरोध निवडणुकीला संमती दिल्यास केवळ १ ते २ जागांवर बोळवण करून चेष्टा केली जाते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार