शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 9:51 AM

भोर तालुक्यात शेतकऱ्याचे  मुख्य पीक भात हे आहे. याचे लागवडीचे क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर तर भुईमुग ४ हजार १०० हेक्‍टर व सोयाबीन ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे

महूडे (पुणे): गेले काही दिवसांपासून पाऊसाने ओड दिली होती. परंतु गुलाब या वादळामुळे भोर तालुक्यात ढगाळ वातावरण आहे तसेच पाऊसाच्या तुरळक सरी पडल्याने बळीराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. या पावसामुळे सोयाबीन व भुईमूग या पिकाचे काय होणार? यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

भोर तालुक्यात शेतकऱ्याचे  मुख्य पीक भात हे आहे. याचे लागवडीचे क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर तर भुईमुग ४ हजार १०० हेक्‍टर व सोयाबीन ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पडणारा पाऊस हा भात पिकास पोषक असला तरी काढणीस आलेल्या भुईमूग व सोयाबीन पिकास घातक आहे. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भुईमूग व सोयाबीन ही पिके काढणीस आली आहेत. त्यामुळे ही पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे. परंतु मंगळवार (दि.२८) रोजी दुपारी पाऊस झाल्याने भुईमुग, सोयाबीनची काढणी बंद करावी लागली.

बालशौर्य: तेरा वर्षांच्या आयुषने दिले दोघांना ‘आयुष्य’

सध्या शेतीच्या कामासाठी मजुरास २०० रुपये रोज दिला जात आहे. तर अनेक शेतकरी ( वारंगुळा ) एकत्र पद्धतीने पिकांची काढणी करत आहेत. सोयाबीन काढल्यानंतर पावसाच्या भीतीमुळे शेतातच मशीन (यांत्रिक ) भरडले जात आहे. त्यासाठी एका भरलेल्या सोयाबीन पोत्याचे ४०० रुपये घेतले जात आहे. सोयाबीड काढणीनंतर भरडण्यासाठी मशीन वेळेत मिळत नाही त्यामुळे काहींनी शेतातच काढलेले सोयाबीन व्यवस्थित रचून ठेवले आहे. पावसात भिजू नये म्हणून त्यावर प्लास्टिक कागद ठेवला आहे.शेतातून काढून आणलेल्या भुईमूग शेंगा पावसात वाळवायच्या कशा? हाही प्रश्न बळीराजा समोर उभा आहे. 

सोयाबीन यांत्रिक पद्धतीने भरडण्यास एका पोत्यात चारशे रुपये दिले जातात. कारण डिझेल किंमतीत वाढ झाल्यामुळे सोयाबीन मशीनद्वारे भरडण्यासाठी किंमतीत वाढ नाईलाजास्तव करावी लागत असल्याचे सोयाबीन मशीनद्वारे भरडणारे विजय बांदल, रुपेश बांदल, सर्जेराव बांदल ( ब्राम्हणघार ) हरिदास खाटपे,  ( शिंद )यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड