शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पुणे जिल्ह्यातील तब्बल 2 लाखांवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:51 IST

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

ठळक मुद्देनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार पर्यंत अनुदान देण्याची घोषणा

पुणे : राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफी दिली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देखील मिळाला आहे.परंतु शासनाच्या मदतीची, कर्ज माफीची अपेक्षा न करता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून शासनानी ही प्रोत्साहन योजना कागदावरच असून, अद्याप एकाही शेतकऱ्याला लाभ झालेला नाही. यामुळे पुणे जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणारे तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक शेतकरी सध्या या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफी देण्याची घोषणा केली व तातडीने अंमलबजावणी देखील सुरू केली. यामुळे लाॅकडाऊन असताना देखील दीड लाखांपैकी तब्बल सव्वा लाख शेतक-यांना प्रत्येक्ष कर्ज माफीचा लाभ मिळाला. तर दुस-या टप्प्यात शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे कर्ज असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी, या घोषणांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.लाॅकडाऊनमुळे अंमलबजावणी झाली नसल्याचे शासन सांगत असले तरी कर्ज माफीची अंमलबजावणी होऊ शकते मग प्रोत्साहन अनुदानाची का नाही असा असवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. पुणे जिल्ह्यात दरवर्षी तब्बल चार ते साडे चार लाख शेतक-यांना रब्बी आणि खरीप हंगमासाठी पिक कर्ज वाटप केले जाते. यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाटा एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा आहे. तर नियमित कर्जफेड करणाया शेतकऱ्यांचे प्रमाण 40 ते 45 टक्क्या पर्यंत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी किमान 600 ते 700 कोटी रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता आहे. त्यामुळे शासन प्रोत्साहन अनुदान कधी देणार यांची वाट पाहत आहेत. ------ शासनाने तातडीने प्रोत्साहन अनुदान द्यावेशासनाने मार्च महिन्यात नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना 50 हजारा पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतु राज्यावर आलेल्या कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांत यांची अंमलबजावणी झाली नाही. परंतु आता लाॅकडाऊन शिथील झाले असून सर्व व्यवहार हळूहळू पुर्ववत सुरू होत आहेत. यामुळे शासनाने देखील तातडीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीState Governmentराज्य सरकार