शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 14:55 IST

पुणे : कर्जाची वेळेत आणि पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली ...

पुणे : कर्जाची वेळेत आणि पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली असून १ ते ५ सप्टेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे गरजेचे आहे. ते जोडल्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना लाभ देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशांना जास्तीत जास्त रुपये ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी २०१८-१९ किंवा २०१९-२० या वर्षांत घेतलेले कर्ज ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना कर्जाच्या मुद्दलाइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी हा लाभ घेण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.

आधार कार्ड नसलेल्या अशा पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ ‘आपले सरकार सेवा’ केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे व ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावे. तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नसल्यास त्यांनीही बँकेशी संपर्क साधून आधार कार्ड जोडावे, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिलिंद सोबले यांनी केले आहे.

याबाबत सोबले म्हणाले, ‘कर्ज देणाऱ्या संस्थांकडून तसेच बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम शासकीय लेखा परीक्षकांकडून केले जात आहे. शेतकऱ्यांच्या संख्येनुसार लेखापरीक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे. १ ते ५ सप्टेंबर दरम्यान ही तपासलेली माहिती या योजनेच्या पोर्टलवर टाकली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड दिलेले नाही किंवा बँक खात्याला जोडलेले नाही अशांच्या यादी संबंधित संस्था, बँक, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ५ सप्टेंबरला लावण्यात येणार आहेत. त्यात आधार जोडणीबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसही पाठविण्यात येणार आहे.’

ज्या शेतकऱ्यांनी किमान दोन वेळा पूर्ण कर्ज परतफेड केली आहे. अशांना हा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही दोन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड केली आहे अशांना हा लाभ मिळणार आहे.

- मिलिंद सोबले, जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी