शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा, एजंट फरार, इंदापूरातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:43 IST

शेतकऱ्यांकडून पाचशे, हजार कोणाकडून दोन हजार तर काही जणांकडून चार हजार असे पैसे उकळून बोगस विमा एजंट फरार झाले

भिगवण : पीक विमा कंपनीकडून आलो आहे. तुमच्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून हेक्टरी ८० हजार पीक विमा मिळवून देऊ, असे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन प्रत्येकी ७/१२ धारक शेतकऱ्यांकडून पाचशे, हजार कोणाकडून दोन हजार तर काही जणांकडून चार हजार असे पैसे उकळून बोगस विमा एजंट फरार झाले. त्यानंतर अद्यापपर्यंत पीक विमा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आता दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. इंदापूर तालुक्यातील पोंधवडी, मदनवाडी गावात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला आहे.

हा प्रकार इंदापूर तालुक्यातील घडला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तविली जात असून याबाबात दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला असता असा कोणताही पंचनामा झाला नसल्याचा सांगण्यात येत आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करायचे झाल्यास प्रतिनिधींची नावे देखील माहिती नाहीत. एकच पीक दाखवून अनेक शेतकऱ्याचे फोटो एकाच ठिकाणी फोटो देखील काढण्यात आले आहेत.

पीक विम्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीची बाब उजेडात येऊ लागली आहे. हा प्रकार आजू-बाजूच्या अनेक गावांमध्ये झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या बोगस सर्वेक्षणाच्या नावाखाली लाखो रुपये शेतकऱ्यांकडून गोळा केले आहेत. या प्रकाराबाबत फसवणूक झालेले शेतकरी एकत्र येऊन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी दैनिक ‘लोकमत’ला सांगितले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

नुकसान भरपाईचे पैसे विधानसभा निवडणुकीपूर्वी पैसे जमा होतील असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, अद्यापही कोणाच्याही खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले नसल्याने बँकेत कृषी विभागाच्या ऑफिसला गेल्यानंतर शेतकऱ्यांना कळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. या प्रकरणामागील सूत्रधार शोधून सरकारकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मी शासनाच्या खरीपमध्ये कांदा पिकाचा १ रुपयात पीक विमा उतरवला होता. नुकसान झाल्यानंतर तुम्हाला लाभ मिळवून देऊ असे बोलून चहापाणी द्या म्हणून माझ्याकडून पाचशे, भावाकडून दोन हजार घेऊन गेले. -नवनाथ भोसले, शेतकरी, पोंधवडी

विमा उतरविल्याची यादी घेऊन कंपनीकडून आलो आहोत असे भासवून हेकटरला ८० हजार नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे सांगून एक हजार रुपये घेऊन गेले, असे गावातील ७० ते ८० जणांकडून पैसे घेऊन गेले आहेत. -गजानन खारतोडे, शेतकरी, पोंधवडी

असा प्रकार निमगाव केतकीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यावर आम्ही तात्काळ कृषी आयुक्तालायामार्फत कारवाई केली. असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही जनजागृती करत शेतकऱ्यांनी एक रुपयांही देऊ नये, असे आव्हान शेतकऱ्यांना केले होते. मात्र, या गावांमध्ये असे प्रकार घडले असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. -भाऊसाहेब रुपनवर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणFarmerशेतकरीfarmingशेतीMONEYपैसाfraudधोकेबाजी