शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा, एजंट फरार, इंदापूरातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:43 IST

शेतकऱ्यांकडून पाचशे, हजार कोणाकडून दोन हजार तर काही जणांकडून चार हजार असे पैसे उकळून बोगस विमा एजंट फरार झाले

भिगवण : पीक विमा कंपनीकडून आलो आहे. तुमच्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून हेक्टरी ८० हजार पीक विमा मिळवून देऊ, असे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन प्रत्येकी ७/१२ धारक शेतकऱ्यांकडून पाचशे, हजार कोणाकडून दोन हजार तर काही जणांकडून चार हजार असे पैसे उकळून बोगस विमा एजंट फरार झाले. त्यानंतर अद्यापपर्यंत पीक विमा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आता दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. इंदापूर तालुक्यातील पोंधवडी, मदनवाडी गावात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला आहे.

हा प्रकार इंदापूर तालुक्यातील घडला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तविली जात असून याबाबात दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला असता असा कोणताही पंचनामा झाला नसल्याचा सांगण्यात येत आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करायचे झाल्यास प्रतिनिधींची नावे देखील माहिती नाहीत. एकच पीक दाखवून अनेक शेतकऱ्याचे फोटो एकाच ठिकाणी फोटो देखील काढण्यात आले आहेत.

पीक विम्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीची बाब उजेडात येऊ लागली आहे. हा प्रकार आजू-बाजूच्या अनेक गावांमध्ये झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या बोगस सर्वेक्षणाच्या नावाखाली लाखो रुपये शेतकऱ्यांकडून गोळा केले आहेत. या प्रकाराबाबत फसवणूक झालेले शेतकरी एकत्र येऊन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी दैनिक ‘लोकमत’ला सांगितले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

नुकसान भरपाईचे पैसे विधानसभा निवडणुकीपूर्वी पैसे जमा होतील असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, अद्यापही कोणाच्याही खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले नसल्याने बँकेत कृषी विभागाच्या ऑफिसला गेल्यानंतर शेतकऱ्यांना कळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. या प्रकरणामागील सूत्रधार शोधून सरकारकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मी शासनाच्या खरीपमध्ये कांदा पिकाचा १ रुपयात पीक विमा उतरवला होता. नुकसान झाल्यानंतर तुम्हाला लाभ मिळवून देऊ असे बोलून चहापाणी द्या म्हणून माझ्याकडून पाचशे, भावाकडून दोन हजार घेऊन गेले. -नवनाथ भोसले, शेतकरी, पोंधवडी

विमा उतरविल्याची यादी घेऊन कंपनीकडून आलो आहोत असे भासवून हेकटरला ८० हजार नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे सांगून एक हजार रुपये घेऊन गेले, असे गावातील ७० ते ८० जणांकडून पैसे घेऊन गेले आहेत. -गजानन खारतोडे, शेतकरी, पोंधवडी

असा प्रकार निमगाव केतकीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यावर आम्ही तात्काळ कृषी आयुक्तालायामार्फत कारवाई केली. असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही जनजागृती करत शेतकऱ्यांनी एक रुपयांही देऊ नये, असे आव्हान शेतकऱ्यांना केले होते. मात्र, या गावांमध्ये असे प्रकार घडले असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. -भाऊसाहेब रुपनवर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणFarmerशेतकरीfarmingशेतीMONEYपैसाfraudधोकेबाजी