शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

लोकप्रतिनिधींच्या नादाणपणामुळे शेतकरी उचलतो टोकाचं पाऊल; राजू शेट्टी यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:13 IST

शेती तुकड्या तुकड्यांची असल्याने उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी येतात

श्रीकिशन काळे 

पुणे : तुकड्या तुकड्यांची शेती झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतोय. परिणामी कमी शेतीमध्ये घरातील गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि मग शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. हा विचारच येऊ नये, यासाठी ठोस धोरण करायला हवे. लोकप्रतिनिधींचा नादाणपणा आहे की, ते धोरणासाठी अर्थसंकल्पात काहीच करत नाहीत, अशी खंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

विनायक हेगाणा लिखित ‘शेतकरी आत्महत्या - शोध आणि बोध’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सकाळी सुमंत मुळगावकर सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगासे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, लोकमतचे संपादक संजय आवटे, आमदार कैलास पाटील, शांतीवन संस्थेच्या कावेरी दीपक नागरगोजे, अविनाश मोरे आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, लोकसंख्या प्रचंड वाढली आहे आणि शेती मात्र कमी होत आहे. कमी शेती असेल तर त्यामध्ये उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या. त्याचा वापर कमी शेती असणाऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे उत्पादनात तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून जोडधंदा शिकवायला हवा. ज्वारी विकण्यापेक्षा त्याचे पीठ तयार करणे, हरभरापासून बेसन व त्यापासून पापडी तयार करून विकणे असे उद्योग त्यांना करता आले पाहिजेत. तरच शेतकरी सधन होऊ शकतो.’’

संजय आवटे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतीकडे उद्योग, व्यवसाय म्हणून वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. शेतीचे मॉडेल बदलले पाहिजे. प्रश्नांवर उत्तरे शोधून प्रत्यक्ष काम व्हावे. गावांना शाश्वत विकासाचे मॉडेल दिले तरच तिथे विकास होईल. तेथील समस्या सुटतील. शेतकऱ्यांच्या समस्यांचा शोध आणि उपाय विनायकने या पुस्तकात अतिशय प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.’’

पुस्तकामागील भूमिका मांडताना हेगाणा म्हणाले, शेतकरी आत्महत्या करूच नये, यासाठी मी काम करायचे ठरवले होते. त्यातून शिवार हेल्पलाइन, समुपदेशन केंद्र सुरू केली. विधवांसाठी काम होत आहे. आत्महत्याग्रस्त उस्मानाबाद हे त्यातून मुक्त व्हावे यासाठीच प्रयत्न आहे.’’डॉ. आगाशे, नागरगोजे यांनी मनोगते व्यक्त केली.

गावांमध्ये शाश्वत विकासाचे मॉडेल राबवावे

शेतकरी आर्थिक साक्षर व्हायला हवा. हातात पैसे आले की, त्यांनी ते बँकेत टाकून गुंतवले पाहिजेत. शेतकऱ्यांचे पीपीएफ खाते हवे. त्यातून पैशांची वाढ होते. या मूलभूत गोष्टी ग्रामीण भागापर्यंत जायला हव्यात. मराठवाड्यात उद्योग नाहीत, रोजगार नाही. म्हणून दररोज २०० कुटुंबे तेथून शहरात येतात आणि इथे चायनीज गाडा टाकून उदरनिर्वाह करतात. त्यांना २०० एकर जमिनीपेक्षा हा गाडा भारी वाटतो. हे बदलणे आवश्यक आहे आणि त्यासाठी गावांमध्ये शाश्वत विकासाचे मॉडेल राबवावे. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारRainपाऊस