शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या नादाणपणामुळे शेतकरी उचलतो टोकाचं पाऊल; राजू शेट्टी यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:13 IST

शेती तुकड्या तुकड्यांची असल्याने उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी येतात

श्रीकिशन काळे 

पुणे : तुकड्या तुकड्यांची शेती झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतोय. परिणामी कमी शेतीमध्ये घरातील गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि मग शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. हा विचारच येऊ नये, यासाठी ठोस धोरण करायला हवे. लोकप्रतिनिधींचा नादाणपणा आहे की, ते धोरणासाठी अर्थसंकल्पात काहीच करत नाहीत, अशी खंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

विनायक हेगाणा लिखित ‘शेतकरी आत्महत्या - शोध आणि बोध’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सकाळी सुमंत मुळगावकर सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगासे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, लोकमतचे संपादक संजय आवटे, आमदार कैलास पाटील, शांतीवन संस्थेच्या कावेरी दीपक नागरगोजे, अविनाश मोरे आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, लोकसंख्या प्रचंड वाढली आहे आणि शेती मात्र कमी होत आहे. कमी शेती असेल तर त्यामध्ये उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या. त्याचा वापर कमी शेती असणाऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे उत्पादनात तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून जोडधंदा शिकवायला हवा. ज्वारी विकण्यापेक्षा त्याचे पीठ तयार करणे, हरभरापासून बेसन व त्यापासून पापडी तयार करून विकणे असे उद्योग त्यांना करता आले पाहिजेत. तरच शेतकरी सधन होऊ शकतो.’’

संजय आवटे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतीकडे उद्योग, व्यवसाय म्हणून वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. शेतीचे मॉडेल बदलले पाहिजे. प्रश्नांवर उत्तरे शोधून प्रत्यक्ष काम व्हावे. गावांना शाश्वत विकासाचे मॉडेल दिले तरच तिथे विकास होईल. तेथील समस्या सुटतील. शेतकऱ्यांच्या समस्यांचा शोध आणि उपाय विनायकने या पुस्तकात अतिशय प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.’’

पुस्तकामागील भूमिका मांडताना हेगाणा म्हणाले, शेतकरी आत्महत्या करूच नये, यासाठी मी काम करायचे ठरवले होते. त्यातून शिवार हेल्पलाइन, समुपदेशन केंद्र सुरू केली. विधवांसाठी काम होत आहे. आत्महत्याग्रस्त उस्मानाबाद हे त्यातून मुक्त व्हावे यासाठीच प्रयत्न आहे.’’डॉ. आगाशे, नागरगोजे यांनी मनोगते व्यक्त केली.

गावांमध्ये शाश्वत विकासाचे मॉडेल राबवावे

शेतकरी आर्थिक साक्षर व्हायला हवा. हातात पैसे आले की, त्यांनी ते बँकेत टाकून गुंतवले पाहिजेत. शेतकऱ्यांचे पीपीएफ खाते हवे. त्यातून पैशांची वाढ होते. या मूलभूत गोष्टी ग्रामीण भागापर्यंत जायला हव्यात. मराठवाड्यात उद्योग नाहीत, रोजगार नाही. म्हणून दररोज २०० कुटुंबे तेथून शहरात येतात आणि इथे चायनीज गाडा टाकून उदरनिर्वाह करतात. त्यांना २०० एकर जमिनीपेक्षा हा गाडा भारी वाटतो. हे बदलणे आवश्यक आहे आणि त्यासाठी गावांमध्ये शाश्वत विकासाचे मॉडेल राबवावे. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारRainपाऊस