शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Chandrakant Patil: फडणवीस सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या बँकेबाहेर रांगा; आता केंद्र सरकार सोडून त्यांना कुठेही पैसे मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:07 IST

२०१४ ते २०१९ या काळात शेतकरी बँकेच्या दारावर रांगा लावून उभे असायचे. कारण त्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारकडून काही ना काही पैसे आलेले असायचे

पुणे : कोव्हीड काळात नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारने २ - २ हजार रुपयांचे तीन इंस्टॉलमेंट भरले आहेत. एकूण ५४ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरले. २०१४ ते २०१९ या काळात शेतकरी बँकेच्या दारावर रांगा लावून उभे असायचे. कारण त्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारकडून काही ना काही पैसे आलेले असायचे. आता केंद्र सरकारचे पैसे सोडले तर कुठेही पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर टीका केली. 

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची कुठलीच कामे झाली नाहीत. दोन वर्षाच्या काळात सरकारचा पैसे कमवण्याचा धंदा जोरात सुरू आहे. ज्या मुंबई पोलिसांचं नाव जगभरात घेतले जात होतं, त्या मुंबईचे पोलीस आयुक्तच परागंदा होते. मंत्रिमंडळातील एक तृतीयांश गट कुठल्या ना कुठल्या आरोपांनी चर्चेत आहे. सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वच समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या दोन वर्षात सरकारने घेतलेले अनेक निर्णय हायकोर्टात टिकले नाहीत, कोर्टाने त्यांना फटकारले आहे. सरकारच्या दोन वर्षाच्या काळात फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन तर करणारच नाही परंतु निषेध मात्र नक्की करणार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी