शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

शेतकऱ्यांना आता दोन कृषिपंपांसाठी स्वतंत्र डीपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:04 AM

राज्यात सध्या ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपधारक शेतकरी आहेत.

कळस : महावितरणने दोन कृषिपंपांसाठी एक डीपी देण्याचे नियोजन केले आहे. लवकरच वीजजोडणीसाठी पैसे भरलेल्या, परंतु प्रत्यक्षात जोडणी न मिळालेल्या शेतकºयांना दोन कृषिपंपांसाठी एक स्वतंत्र डीपी दिला जाणार आहे. त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. शेतकºयांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.राज्यात सध्या ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपधारक शेतकरी आहेत. याशिवाय मार्च २०१८ अखेरपर्यंत कृषिपंप वीजजोडणीसाठी तब्बल २ लाख ४९ हजार ३५७ इतक्या शेतकºयांनी महावितरणकडे पैसे भरले. यातील बहुतेक शेतकºयांनी चार ते पाच वर्षांपूर्वीच महावितरणकडे पैसे भरलेले होते. आता अशा शेतकºयांना कृषिपंपासाठी वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने उच्च दाब वितरणप्रणालीचे नियोजन केलेले आहे. या प्रणालीद्वारे केवळ दोन कृषिपंपांसाठी एक स्वतंत्र डीपी दिला जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून पाच हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.बारामती परिमंडळातील सोलापूर, सातारा जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील सुमारे ३२ हजार कृषिपंपांसाठी पहिल्या टप्प्यात स्वतंत्र वीजजोडणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठ्याच्या जाचातून शेतकºयांची सुटका होण्यास मदत होणार आहे.४सध्याच्या पद्धतीनुसार, शेतकºयांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय शेतकºयांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीजहानी, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात आदींना महावितरणला सामोरे जावे लागते.४या सर्व अडचणींवर यामुळे मात करता येणे शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रतिकृषिपंप २ लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेवर ४४९६.६९ कोटी व नवीन उपकेंद्रासाठी लागणारा अंदाजे खर्च ५५१.४४ कोटी अशा एकूण ५,०४८.१३ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

टॅग्स :electricityवीज