शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

Pune: खेड सेझबाधित शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:12 IST

शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार...

राजगुरुनगर : १४ वर्षे प्रलंबित खेड सेझ बाधित शेतकऱ्यांचा १५ टक्के परताव्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शासकीय पातळीवर एमआयडीसीमार्फतच जमिनीची विक्री करून शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

खेड सेझ प्रकल्प २००८मध्ये अस्तित्वात आला. या प्रकल्पांतर्गत बाराशे पंचवीस १२२२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. केंदूर, निमगाव दावडी, कनेरसर या गावांमधील जमिनीचा त्यामध्ये समावेश आहे. सेझ प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे. या उदात्त हेतूने १५ टक्के परतावा देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र विविध कारणामुळे गेली १४ वर्षे हा प्रश्न प्रलंबित असा राहिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकरी विविध मार्गाने प्रयत्न करून न्यायाच्या प्रतीक्षेत होता.

नुकतीच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रयत्नातून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्रालयात (विभागात) झालेल्या प्रशासकीय पातळीवरील नियोजित बैठकीमध्ये या प्रश्नाबाबत ठोस निर्णय घेण्यात आला व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या बाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनीसुद्धा परताव्याच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांची भूमिका मांडताना शासनाने सेझसाठी जमिनी संपादित केल्या असल्यामुळे परताव्याचा प्रश्नसुद्धा शासकीय पातळीवरच सुटला पाहिजे, अशी भूमिका मांडली. यावेळी वरुडे गावचे सरपंच मारुती थिटे, चिंचबाईवाडी गावचे माजी सरपंच संतोष गार्डी, गोसासी गावचे सरपंच संतोष गोरडे, वाफगावचे सरपंच उमेश रामाने, बाळासाहेब जवळेकर, बापूसाहेब दौंडकर, पोपटराव गोडसे, बाळासाहेब माशेरे, काशीनाथ हजारे, सचिन वाबळे, विठ्ठल तांबे, मुरली जाधव, सतीश फुटाणे व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUday Samantउदय सामंत