शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ऊसाचा रस घेऊन साखर आयुक्तांची आंदोलकांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:53 IST

मंगळवारी सायंकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शेतक-यांबरोबर ऊसाचा सर घेवून चर्चा केली.तसेच एफआरपीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

पुणे: बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघातील तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपी (उसाचा रास्त आणि किफायतशीर दर) दिली नाही.त्याच्या निर्षेधार्थ शिवसेनेने साखर आयुक्त कार्यालयासमोर रसवंतीगृह सुरू करून अनोख्या पध्दतीने आंदोलन सुरू केले.मंगळवारी सायंकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलक शेतक-यांबरोबर ऊसाचा सर घेवून चर्चा केली.तसेच एफआरपीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

साखर कारखाने सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला.मात्र,बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघातील लोकनेते सुंदरावजी सहकारी साखर कारखाना,छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि जय महेश सहकारी साखर कारखाना या तीनही साखर कारखान्यांनी शेतक-यांची एफआरपी दिली नाही.त्यामुळे बीड जिल्हातील माजलगाव शिवसेना तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी व त्यांच्या सहका-यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर रसवंतीगृह सुरू करून २ रुपये दराने ऊसाच्या रसाची विक्री करत आंदोलन केले.त्यावर स्वत: साखर आयुक्त यांनी आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांची भेट घेवून त्यांच्या बरोबर ऊसाचा रस घेऊन चर्चा केली.तसेच ऊसाच्या रसाचे पैसेही शेतक-यांना दिले.

दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांनी कसाबसा ऊस जगवला.कारखानदारांकडे खेटा मारून कारखान्यापर्यंत पोहचवला.परंतु,कारखान्याला ऊस जाऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेले.तरीही एफआरपी मिळत नाही.त्यामुळे साखर आयुक्तालयासमोर आंदोलन सुरू केले.येत्या १५ जानेवारीपासून सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह आंदोलन करणार आहेत,असे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने