शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
4
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
5
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
6
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
7
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
8
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
9
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
10
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
11
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
12
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
13
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
14
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
15
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
16
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
17
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
19
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर

‘कुटुंब मणिपूरमध्ये..चिंतेनं आम्हाला झोप लागेना’, पुण्यात शिकणाऱ्या मणिपुरी विद्यार्थ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:04 IST

राज्यकर्त्यांनी स्वत:चा फायदा सोडून लोकांचा विचार करावा

पुणे : मणिपूर तिकडं जळतंय आणि आम्ही इथं पुण्यात आहोत. आमचं सर्व कुटुंब तिथं आहे. त्यांच्या चिंतेने रात्रभर झोप लागत नाही. इथं चूक कोणत्या एका समाजाची आहे असे आम्ही मानत नाही, तर दोन्ही समाजाची चूक आहे. हे सगळं थांबायला हवं. पुन्हा त्या भागात शांतता आणि भाईचारा निर्माण व्हावा, अशी भावना पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मणिपुरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तीन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असते तर इतकी परिस्थिती चिघळली नसती, असेही ते म्हणाले.

गेल्या सत्तर दिवसांपासून मणिपूरमध्ये संघर्ष पेटला आहे. तिथली परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. मैतई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आल्यानंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. नुकताच दोन महिलांचा नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काही मणिपुरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मैतई आणि कुकी समाजात अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची जाणीव कुणालाच नव्हती. अचानक महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

''समाजात अनेकदा गैरसमजुती निर्माण केल्या जातात. आगीत तेल टाकण्याचे काम केले जाते. त्यामुळे दंगली घडतात. सध्या मणिपूरमध्ये जे चालू आहे ते मैतई आणि कुकी समाजामधले वाद आहेत. आमचे कुटुंब त्या भागात राहते. त्यामुळे भीती वाटते. महिलांची नग्न धिंड काढल्याचे कृत्य अतिशय चुकीचे आहे, पण यात चूक दोन्ही समाजाची आहे. एका घटनेमुळे संपूर्ण मैतई समाजाला दोष देणे चुकीचे आहे. मणिपूरमध्ये शांतता नांदावी हीच आमची इच्छा आहे. - मलेन, मणिपुरी विद्यार्थी.''

''सुरुवातीपासूनच मणिपूर राज्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आत्ता सुरू असलेली परिस्थिती खूप भीतीदायक आहे. मी मणिपूरची रहिवासी आहे. त्यामुळे तिथे सुरू असलेल्या एकंदर घडामोडीबद्दल खूप वाईट वाटते. मणिपूरचा प्रश्न कोणत्या धर्माशी संबंधित नसून मानवतेशी आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी स्वत:चा फायदा सोडून लोकांचा विचार केला पाहिजे. मणिपूरची परिस्थिती लवकर सुधारेल, अशी आशा आम्ही घरातील सगळेच लोक करत आहोत. - सोनिका युमनाम, मणिपूर विद्यार्थिनी.'' 

टॅग्स :PuneपुणेManipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी