शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘कुटुंब मणिपूरमध्ये..चिंतेनं आम्हाला झोप लागेना’, पुण्यात शिकणाऱ्या मणिपुरी विद्यार्थ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:04 IST

राज्यकर्त्यांनी स्वत:चा फायदा सोडून लोकांचा विचार करावा

पुणे : मणिपूर तिकडं जळतंय आणि आम्ही इथं पुण्यात आहोत. आमचं सर्व कुटुंब तिथं आहे. त्यांच्या चिंतेने रात्रभर झोप लागत नाही. इथं चूक कोणत्या एका समाजाची आहे असे आम्ही मानत नाही, तर दोन्ही समाजाची चूक आहे. हे सगळं थांबायला हवं. पुन्हा त्या भागात शांतता आणि भाईचारा निर्माण व्हावा, अशी भावना पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मणिपुरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तीन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असते तर इतकी परिस्थिती चिघळली नसती, असेही ते म्हणाले.

गेल्या सत्तर दिवसांपासून मणिपूरमध्ये संघर्ष पेटला आहे. तिथली परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. मैतई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आल्यानंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. नुकताच दोन महिलांचा नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काही मणिपुरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मैतई आणि कुकी समाजात अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची जाणीव कुणालाच नव्हती. अचानक महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

''समाजात अनेकदा गैरसमजुती निर्माण केल्या जातात. आगीत तेल टाकण्याचे काम केले जाते. त्यामुळे दंगली घडतात. सध्या मणिपूरमध्ये जे चालू आहे ते मैतई आणि कुकी समाजामधले वाद आहेत. आमचे कुटुंब त्या भागात राहते. त्यामुळे भीती वाटते. महिलांची नग्न धिंड काढल्याचे कृत्य अतिशय चुकीचे आहे, पण यात चूक दोन्ही समाजाची आहे. एका घटनेमुळे संपूर्ण मैतई समाजाला दोष देणे चुकीचे आहे. मणिपूरमध्ये शांतता नांदावी हीच आमची इच्छा आहे. - मलेन, मणिपुरी विद्यार्थी.''

''सुरुवातीपासूनच मणिपूर राज्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आत्ता सुरू असलेली परिस्थिती खूप भीतीदायक आहे. मी मणिपूरची रहिवासी आहे. त्यामुळे तिथे सुरू असलेल्या एकंदर घडामोडीबद्दल खूप वाईट वाटते. मणिपूरचा प्रश्न कोणत्या धर्माशी संबंधित नसून मानवतेशी आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी स्वत:चा फायदा सोडून लोकांचा विचार केला पाहिजे. मणिपूरची परिस्थिती लवकर सुधारेल, अशी आशा आम्ही घरातील सगळेच लोक करत आहोत. - सोनिका युमनाम, मणिपूर विद्यार्थिनी.'' 

टॅग्स :PuneपुणेManipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी