शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अपघाताचा फोन खणाणला आणि दहा वर्षांनी कुटुंबियांना ‘दीपक’ मिळाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 17:06 IST

पुण्यामध्ये आल्यानंतर दीपकने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर जेमतेम एक महिना त्याने कुंटुंबियासोबत दूरध्वनीवरुन संपर्क ठेवला. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क करणे त्याने बंद केले.

ठळक मुद्देरिअल लाईफ रिअल पिपलचा पुढाकार उत्तराखंडचा तरुण दहा वर्ष घरापासून होता वंचित 

- प्रकाश गायकर- पिंपरी : एक दिवस उत्तराखंडमधील पियोरागड जिल्ह्यातील किलगाव येथील जखमी झालेल्या दीपक चंदच्या घरी शेजारील गावच्या प्रमुखाचा फोन आला. फोनवर सांगण्यात आले की, तुमचा भाऊ दीपक याचा पुण्यामध्ये अपघात झाला आहे. दहा वर्षांपूर्वी अचानक गायब झालेल्या भावाचा अपघात झाल्याचे ऐकून भाऊ संदीप यांना काय बोलावे ते सुचेना. फोनवरच त्यांना रुग्णालयाचा पत्ता देण्यात आला. आपल्या दोन नातेवाईकांना घेऊन संदीप यांनी उत्तराखंडमधून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय गाठले. भावाला जखमी अवस्थेमध्ये पाहून संदीप यांच्या भावनेचा बांध फुटला. भावाचा अपघात झाल्याने मनात दु :ख तर झालेच होते, मात्र अपघात झाला म्हणून भाऊ भेटला याचे समाधानही वाटत होते. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये दीपक रोजगाराच्या शोधात पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर जेमतेम एक महिना त्याने कुंटुंबियासोबत दूरध्वनीवरुन संपर्क ठेवला. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क करणे त्याने बंद केले. त्यानंतर भाऊ संदीप चंद यांने आपल्या जवळच्या नातेवाईकांना घेऊन पुण्यामध्ये भावाची शोधाशोध केली. शहरातील नामवंत कंपन्या, हॉटेल्स, सोसायट्या आणि परिसर पिंजून काढला. मात्र दीपकचा कुठेच शोध लागला नाही. काही दिवस शोधाशोध केल्यानंतर कुटुंबियांनी तो पुन्हा येण्याच्या सर्व आशा सोडून दिल्या. 

पुनावळे येथे दीपकचा अपघात झाल्यानंतर त्याला वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर समजले की या तरुणाचे कोणीही नाही. रिअल लाईफ रिअल पिपलचे संस्थापक एम.ए.हुसैन यांनी त्या तरुणाची जबाबदारी स्वीकारली. जखमी अवस्थेत तरुणाकडे विचारपूस केल्यानंतर त्याने उत्तराखंड येथील त्याचा पत्ता सांगितला. फोन नंबर नसल्याने एम.ए.हुसैन यांनी जवळील गावच्या प्रमुखाला फोन करुन सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर कुटुंबियांपर्यंत दीपकच्या अपघाताची बातमी पोहचली. या कार्यामध्ये समाजसेवक महादेव बोत्रे, रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेचे कर्मचारी, रुग्णालयातील परिचारिका यांची साथ लाभली. अपघात झाल्यामुळे दहा वषार्पासून काहीही संपर्क नसलेल्या भावाचा शोध लागला. तर दहा वषार्पूर्वी अचानक सोडून गेलेला मुलगा पुन्हा मिळाला म्हणून आईच्या आशा पल्लवित झाल्या. 

दीपकने घरच्यांसोबत संपर्क तोडला होता. खूप शोधूनही तो मिळाला नाही तेव्हा आम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या. तो मृत झाला आहे असे समजून आम्ही त्याचा मृत्यूचा दाखला काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र त्याचा अपघात झाल्यानंतर रिअल लाईफ रिअल पिपल ही संस्था मदतीसाठी धावून आली. या संस्थेमुळे दहा वर्षांनी माझा भाऊ सापडला.- संदीप चंद, भाऊ.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात