शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कौटुंबिक न्यायालय 'ई-फायलिंग'मध्ये अग्रेसर;वकिलांचा वेळ वाचला

By नम्रता फडणीस | Updated: June 26, 2025 16:20 IST

पेपरलेस कामकाजामुळे आता फाइल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून, ई-फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे.

पुणे : देशभरातील न्यायालयांसाठी रोल मॉडेल ठरलेले पुण्यातील कौटुंबिक न्यायालय ‘ई-फायलिंग’मध्ये अग्रेसर ठरले असून, न्यायालयीन कामकाज १०० टक्के पेपरलेस करण्यात कौटुंबिक न्यायालयाला यश मिळाले आहे. पेपरलेस कामकाजामुळे आता फाइल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून, ई-फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज ई-फायलिंगद्वारे करण्याची अधिसूचना काढली. त्यानुसार जिल्ह्यामधील न्यायालयांनी ‘ई-फायलिंग’ प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली असली, तरी अजूनही जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ई फायलिंग’ प्रणालीचा १०० टक्के वापर होताना दिसत नाही.

ई-फायलिंग प्रक्रियेत विविध प्रकारच्या समस्या वकिलांना उद्भवत असून, न्यायालयीन कामकाजाला विलंब होत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याला पुण्याचे कौटुंबिक न्यायालय अपवाद ठरले आहे. कौटुंबिक न्यायालयाचे बहुतांश कामकाज पेपरलेस होत असून, केवळ ई-फायलिंगद्वारेच दावे दाखल होत असल्याचे वकिलांनी सांगितले.

ई-फायलिंगमुळे पक्षकारांना मेसेजद्वारे जाते सुनावणीच्या तारखेचे नोटिफिकेशन

एखादी केस ई-फायलिंग केल्यावर दोन्ही पक्षकारांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. ई-फायलिंगमध्ये तुमच्या विरुद्ध केस दाखल झाली आहे, हे नोटीफाय होते. तुमच्या या क्रमांकाची केस रजिस्टर झाली असून, तारीख कोणती पडली आहे, याचे पक्षकारांना मेसेज पाठवले जातात. वकिलांनादेखील मेल केला जातो.

ई-फायलिंग म्हणजे काय?

ई-फायलिंग म्हणजे न्यायालयात दाखल करायच्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन प्रणाली वापरणे. या प्रणालीमुळे वकिलांना आणि पक्षकारांना कोणत्याही ठिकाणाहून न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहता, ऑनलाइन अर्ज, शपथपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे दाखल करता येतात.

ई-फायलिंगचे फायदे

१) न्यायालयाच्या चकरा वाचल्यामुळे प्रवासाच्या आणि इतर खर्चात बचत होते.

२) ऑनलाइन प्रणालीमुळे कागदपत्रे सुरक्षित राहतात.

३) केससंबंधी माहिती ऑनलाइन उपलब्ध असल्याने कामकाज अधिक पारदर्शक होते.

पूर्वी कौटुंबिक न्यायालयात कागदपत्रे फायलिंगसाठी दिली जायची. तिथे माणूस उपलब्ध असेल किंवा नसेल तरी पंधरा दिवसांनी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन व्हायचे. त्यानंतर फायलिंग क्रमांक पडून केस कोर्टात जात असे. यात कागदपत्रे गहाळ होणे किंवा आम्हाला कागदपत्रेच मिळाली नाही. त्यामुळे प्रक्रिया लांबली जायची. पण ‘ ई-फायलिंग’मुळे हा सगळा प्रकार थांबला आहे. आता कागदपत्रे पाहिली नाहीत किंवा कागदपत्रे मिळाली नाहीत, हे कुणीच नाकारू शकत नाही. वकीलपत्र असलेल्या प्रत्येक वकिलाला ई-फायलिंगचा ॲक्सेस मिळतो. त्यामुळे वकिलांना केससाठी तत्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देता येतात. एखाद्या वकिलाची फाईल हरवली, तरी ई-फायलिंगमध्ये कागदपत्रे सेव्ह असल्याने वकिलांना फाईल घेऊन फिरायची गरज भासत नाही. ई-फायलिंगचे कामकाज वकिलांसाठी फायदेशीर ठरत आहे. - ॲड. प्रसाद निकम  कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंगद्वारे केस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वकिलांचा वेळ वाचला आहे. कोणत्याही ठिकाणावरून आणि कोणत्याही वेळेस वकील ई-फायलिंगच्या माध्यमातून केस दाखल करणे वकिलांसाठी फायदेशीर ठरत आहे. - ॲड. सुरेश एस. बेराड, मुंबई उच्च न्यायालय

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड