शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी पुणे विभागात घेणार मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 01:15 IST

भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांचे कार्य मोठे आहे.

पुणे : भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अनेक हात सरसावतात, असे असतानाही हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषदेने हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना दत्तक घेण्याचे ठरवत आयोजित केलेला मेळावा कौतुकास्पद आहे. पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात हुतात्म्यांची अनेक कुटुंबीये असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना केवळ पैशाच्या स्वरूपात मदत न करता त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक अडणींची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना या कुुटुंबीयांना दत्तक घेण्याचे ठरवले आहे. यासाठी पहिल्या टप्यात ११५ कुटुंबीयांची निवड करण्यात आली असून महिला दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा परिषदेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हैसेकर बोलत होते.या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (निवृत्त) जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते.डॉ. म्हैसेकर म्हणाले, हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी योजना खूप असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन झाले नाही तर त्याचा फायदा त्यांना घेता येत नाही. शासनाकडून मिळणारी मदत फक्त लवकर देण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत. जमिनीच्या मुलांच्या शाळेच्या अडचणी, आरोग्य, कागदपत्रे आदी समस्या आहेत. या सर्वांची सोडवणूक या अधिकारी मंडळींकडून केली जाणार आहे. सूरज मांढरे म्हणाले, या कुटुंबीयांच्या निरंतर पाठीशी कुणी तरी उभा राहणे आवश्यक आहे. यासाठी मदतीचा प्रयत्न केला जाणार आहे. ११५ कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. धोरणात्मक बदलासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. ११५ कुटुंबीयांची जबाबदारी प्रत्येक अधिकाºयांना विभागून दिली आहे. त्यांना येणाºया समस्या संबंधित अधिकाºयांच्या मार्फत सोडवल्या जातील.>कुटुंबीयांनी मांडल्या समस्या१९६५, १९७१, कारगिल युद्ध तसेच शांतता काळात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे कुुटुंबीय या मेळाव्यात सहभागी झाले होते. अनेकांना शेतीसाठी जमिनी मिळाल्या नाहीत, नोकरीसाठी अर्ज करूनही नोकरी मिळाल्या नाहीत, पेट्रोल पंपासाठी अर्ज करूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही यांसारख्या समस्या अधिकाºयांपुढे मांडल्या. या वेळी उपस्थित अधिकाºयांनी त्यांच्या समस्यांचे निराकरून करून यापुढे त्यांना येणाºया प्रत्येक अडचणीत मदत करण्याचे आश्वासन दिले. माझे वडील १९६५च्या युद्धात शहीद झाले. त्यांना सेवा मेडल होते. त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय नोकरी, जमीन तसेच पेट्रोल पंप मिळावा यासाठी शासनाशी अनेक पत्रव्यवहार केले. राष्ट्रपतींनाही आम्ही पत्र लिहिले. मात्र, अद्यापही आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही. शैक्षणिक पात्रता असतानाही मला नोकरी मिळाली नाही. यामुळे अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला. जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे तसेच शासनातर्फे आयोजित अनेक मेळाव्यात सहभाग घेतला. मात्र, समस्या कायम राहिल्या. या मेळाव्यातून काही मार्ग मिळेल, अशी आशा आहे. - नवनाथ रामदास गोगावले, वीरपुत्र जिल्हा परिषदेच्या अनेक योजना शहीद कुुटुंबीयांसाठी आहेत. आम्ही त्याची यादी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. जिल्हा परिषद अधिकाºयांनी हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड जिल्हा परिषदेला या कामी मदत करणार आहे. मिलिंद तुंगार, मेजर, जिल्हा सैनिक अधिकारी