शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

प्रश्न सोडविण्यात सत्ताधा-यांना अपयश - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:39 IST

निवडणुकीपूर्वी भाजपाकडून अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक अशी सगळीच मंडळी अडचणीत आली आहेत.

पुणे : निवडणुकीपूर्वी भाजपाकडून अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक अशी सगळीच मंडळी अडचणीत आली आहेत. पुणे शहराने भाजपाला खूप दिले मात्र पुणेकरांच्या समस्या सोडविण्यात ते हात आखडता घेत असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी लोकमान्य टिळक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक सुभाष जगताप, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, आश्विनी कदम, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, सुहास उभे उपस्थित होते.बिबट्याला मारण्याचामंत्र्यांना परवाना दिलाय का?जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काय झालाय. ते जिथे-तिथे बंदूक का मिरवतात, असे विचारात त्यांना बिबट्या मारण्याचा परवाना मिळाला आहे का, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावीकोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे अजित पवार यांनी स्वागत केले. न्यायालयीन प्रक्रियेत जास्त वेळ न घालविता या तिघा आरोपींना लवकरात लवकर फाशीला लटकविण्यात यावे. तरच चुकीच्या नजरेने महिलांकडे पाहणाºयांवर जबर बसू शकेल, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.अद्याप विकास कुठेही दिसेनाअजित पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई वाढली आहे. एकीकडे शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव नाही तर दुसरीकडे शहरातील नागरिकांना किफायशीर किमतीत वस्तू मिळत नाहीत. सरकार सध्या भानावर नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सत्ता आल्यावर राज्य सरकारने चार लाख कोटींचे कर्ज घेऊन अद्यापही विकास कुठेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.’’सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणी सरकार गप्प का, सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला. सरकार यावर ठोस निर्णय का घेत नाही, हे सरकारचे अपयश असल्याचा उच्चार त्यांनी केला. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागल्यावर आयटी विभाग प्रमुख विजय गौतम यांच्यासारख्या अधिकाºयाला हटवून काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांवर कारवाई का झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.राज्य सरकारने दिलेली आश्वासने गेल्या ३ वर्षांत पूर्ण केली नाहीत. त्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी यावेळी केली.मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जीएसटी रद्द झालाच पाहिजे, दुधाला भाव मिळायलाच हवा, अशा प्रकारचे फलक मोर्चातील कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस