शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न सोडविण्यात सत्ताधा-यांना अपयश - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:39 IST

निवडणुकीपूर्वी भाजपाकडून अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक अशी सगळीच मंडळी अडचणीत आली आहेत.

पुणे : निवडणुकीपूर्वी भाजपाकडून अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक अशी सगळीच मंडळी अडचणीत आली आहेत. पुणे शहराने भाजपाला खूप दिले मात्र पुणेकरांच्या समस्या सोडविण्यात ते हात आखडता घेत असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी लोकमान्य टिळक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक सुभाष जगताप, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, आश्विनी कदम, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, सुहास उभे उपस्थित होते.बिबट्याला मारण्याचामंत्र्यांना परवाना दिलाय का?जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काय झालाय. ते जिथे-तिथे बंदूक का मिरवतात, असे विचारात त्यांना बिबट्या मारण्याचा परवाना मिळाला आहे का, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावीकोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे अजित पवार यांनी स्वागत केले. न्यायालयीन प्रक्रियेत जास्त वेळ न घालविता या तिघा आरोपींना लवकरात लवकर फाशीला लटकविण्यात यावे. तरच चुकीच्या नजरेने महिलांकडे पाहणाºयांवर जबर बसू शकेल, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.अद्याप विकास कुठेही दिसेनाअजित पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई वाढली आहे. एकीकडे शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव नाही तर दुसरीकडे शहरातील नागरिकांना किफायशीर किमतीत वस्तू मिळत नाहीत. सरकार सध्या भानावर नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सत्ता आल्यावर राज्य सरकारने चार लाख कोटींचे कर्ज घेऊन अद्यापही विकास कुठेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.’’सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणी सरकार गप्प का, सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला. सरकार यावर ठोस निर्णय का घेत नाही, हे सरकारचे अपयश असल्याचा उच्चार त्यांनी केला. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागल्यावर आयटी विभाग प्रमुख विजय गौतम यांच्यासारख्या अधिकाºयाला हटवून काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांवर कारवाई का झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.राज्य सरकारने दिलेली आश्वासने गेल्या ३ वर्षांत पूर्ण केली नाहीत. त्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी यावेळी केली.मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जीएसटी रद्द झालाच पाहिजे, दुधाला भाव मिळायलाच हवा, अशा प्रकारचे फलक मोर्चातील कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस