शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातीच्या द्राक्षबागांचे क्षेत्रही हवे किडरोगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निर्यात होणाऱ्या द्राक्षाच्या बागांचे क्षेत्र किडरोग मुक्त करण्यासाठी देशात पहिल्यांदाच उच्चस्तरीय अधिकाºयांची एक समिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : निर्यात होणाऱ्या द्राक्षाच्या बागांचे क्षेत्र किडरोग मुक्त करण्यासाठी देशात पहिल्यांदाच उच्चस्तरीय अधिकाºयांची एक समिती स्थापन केली आहे. राज्यातील नोंदणी झालेल्या ४५ हजार बागांची या समितीकडून त्यासाठी पाहणी करणार आहे.

ज्या देशांमध्ये द्राक्ष निर्यात केली जातात त्या देशांच्या मागणीवरून ही पाहणी करणार आहे. यापुर्वी त्यांनी दिलेल्या निकषांनुसार फक्त उत्पादनाची म्हणजे, द्राक्षांची तपासणी करण्यात येत असे. मात्र आता त्या देशांकडून ज्या क्षेत्रात द्राक्ष पिकवली जातात त्या क्षेत्रातही कसला रोग किंवा किड नाही ना याची पाहणी करण्याची व त्यानुसार ते क्षेत्र प्रमाणीत करण्याची मागणी झाली होती. देशातील एकूण द्राक्ष निर्यातीच्या ९५ टक्के द्राक्ष निर्यात महाराष्ट्रातून व त्यातील ६५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होत असते. त्यामुळे केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने राज्याच्या कृषी मंत्रालयाला ही समिती स्थापन करण्याबाबत एप्रिल २०२० मध्ये कळवले होते.

राज्याच्या फलोत्पादन कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. राज्याचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी ही माहिती दिली. समितीमध्ये किटक शास्त्रज्ञांसह कृषी विभागाच्या वेगवेगळ्या उच्चस्तरीय अधिकाºयांचा समावेश आहे. या समितीकडून तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना पाहणी बाबत प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात एकूण ४५ हजार द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. त्यातील ३५ हजार द्राक्ष बागा नाशिक जिल्ह्यात आहेत. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांकडून प्रत्येक बागेची व समितीकडून त्यातील काही बागांची पाहणी केली जाईल. दिलेले निकष बाग मालकाला सांगितले जातील. त्याप्रमाणे बागेचे संपुर्ण क्षेत्र किड मुक्त आहे किंवा नाही याची तज्ज्ञांकडून पाहणी करून तसे प्रमाणित करून घेण्यात येईल व ती माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाला कळवली जाईल.