शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 18:48 IST

मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते.

ठळक मुद्दे अनेकजण याविषयी पाकिस्तानशी चर्चा करू असे म्हणतात. परंतु, चर्चेची वेळ निघून गेली आता

पुणे : मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते. मागील दहा दिवसांपासून जो प्रकार देशात घडत आहेत. याबाबत अनेकजण याविषयी चर्चा करू असे म्हणतात. परंतु चर्चेची वेळ आता निघून गेली आहे. आम्ही हे केले नाही असे पाकिस्तान बोलत आहे. त्यांना खोट बोलण्याची सवयच आहे. आपला देश अनेक बाबतीत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतु आपल्या आपापसातच दुफळी निर्माण व्हावी असा इतरांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण एकत्र राहून काम केले तर सैनिकांना देखील बळ मिळेल,असे प्रतिपादन मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी केले. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशदवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशिधरन नायर शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुण्यातील नवचैतन्य हास्ययोग परिवार,चंद्रप्रकाश फाऊंडेशन व इतर संस्थांच्यावतीने ह्यजरा याद करो कुबार्नीह्ण या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमांतर्गत शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या कुटुंबियांना एक लाख बावन्न हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी  एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, वीरमाता लता नायर, वीरपत्नी तृप्ती नायर, नवचैतन्य हास्ययोग परिवारचे विठ्ठल काटे, सुमन काटे, पोपटलाल शिंगवी, प्रकाश धोका, मकरंद टिल्लू उपस्थित होते. भूषण गोखले म्हणाले, आपला देश हुशार असून खूप पुढे जाऊ शकतो. परंतु आपणच आपापसात भांडून एकमेकांचे शत्रू बनत चाललो आहे. आपल्यात कशी फूट पडेल यासाठी काही देश टपून बसलेच आहेत. त्यामुळे आपल्या देशात सगळ्यांनी एकी करणे महत्त्वाचे आहे,तृप्ती नायर यांच्या आई शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या सासूबाई निलेखा पेंटा यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, आमच्या अशा कठीण प्रसंगात संपूर्ण देश आमच्या पाठिशी असल्याने आम्ही धीराने या सगळ्याला तोंड देत आहोत. तुमचे असेच सहकार्य, आधार आणि प्रेम आमच्याबरोबर कायम असू द्या. विठ्ठल काटे म्हणाले, आपल्यासाठी आपले सैनिक जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करीत असतात. त्यामुळे सैनिकांना आपण आज हे सांगणे गरजेचे आहे की तुम्ही एकटे नाही सर्व देश तुमच्या पाठिशी आहे.--------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला