शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 18:48 IST

मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते.

ठळक मुद्दे अनेकजण याविषयी पाकिस्तानशी चर्चा करू असे म्हणतात. परंतु, चर्चेची वेळ निघून गेली आता

पुणे : मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते. मागील दहा दिवसांपासून जो प्रकार देशात घडत आहेत. याबाबत अनेकजण याविषयी चर्चा करू असे म्हणतात. परंतु चर्चेची वेळ आता निघून गेली आहे. आम्ही हे केले नाही असे पाकिस्तान बोलत आहे. त्यांना खोट बोलण्याची सवयच आहे. आपला देश अनेक बाबतीत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतु आपल्या आपापसातच दुफळी निर्माण व्हावी असा इतरांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण एकत्र राहून काम केले तर सैनिकांना देखील बळ मिळेल,असे प्रतिपादन मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी केले. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशदवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशिधरन नायर शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुण्यातील नवचैतन्य हास्ययोग परिवार,चंद्रप्रकाश फाऊंडेशन व इतर संस्थांच्यावतीने ह्यजरा याद करो कुबार्नीह्ण या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमांतर्गत शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या कुटुंबियांना एक लाख बावन्न हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी  एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, वीरमाता लता नायर, वीरपत्नी तृप्ती नायर, नवचैतन्य हास्ययोग परिवारचे विठ्ठल काटे, सुमन काटे, पोपटलाल शिंगवी, प्रकाश धोका, मकरंद टिल्लू उपस्थित होते. भूषण गोखले म्हणाले, आपला देश हुशार असून खूप पुढे जाऊ शकतो. परंतु आपणच आपापसात भांडून एकमेकांचे शत्रू बनत चाललो आहे. आपल्यात कशी फूट पडेल यासाठी काही देश टपून बसलेच आहेत. त्यामुळे आपल्या देशात सगळ्यांनी एकी करणे महत्त्वाचे आहे,तृप्ती नायर यांच्या आई शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या सासूबाई निलेखा पेंटा यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, आमच्या अशा कठीण प्रसंगात संपूर्ण देश आमच्या पाठिशी असल्याने आम्ही धीराने या सगळ्याला तोंड देत आहोत. तुमचे असेच सहकार्य, आधार आणि प्रेम आमच्याबरोबर कायम असू द्या. विठ्ठल काटे म्हणाले, आपल्यासाठी आपले सैनिक जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करीत असतात. त्यामुळे सैनिकांना आपण आज हे सांगणे गरजेचे आहे की तुम्ही एकटे नाही सर्व देश तुमच्या पाठिशी आहे.--------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला