शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
4
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
5
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
6
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
7
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
8
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
9
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
10
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
11
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
12
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
13
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
14
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
15
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
16
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
17
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
18
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
19
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
20
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोली मोराची येथील मोरांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: April 9, 2017 04:20 IST

चिंचोली मोराची (ता. शिरूर) व परिसरातील वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. त्याबाबत वन्यजीव मित्र तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

- सिकंदर तांबोळी,  कान्हूर मेसाई

चिंचोली मोराची (ता. शिरूर) व परिसरातील वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. त्याबाबत वन्यजीव मित्र तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.गेली ३ ते ४ वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरातील फळबागाही जळून खाक झालेल्या दिसून येत आहेत. त्याचा जंगलात वावरणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोराला फटका बसला आहे. गेल्या वर्षी वन विभागाने या परिसरात दहा बाय दहाचे दोन फूट खोलीचे पाणथळे बांधले आहेत. गेल्या वर्षी या पाणथळ्यात वनविभागाने दैनिक लोकमतची बातमी प्रसिद्ध होताच तळी बांधून त्यात पाणी सोडले होते. मात्र, या वर्षी एप्रिलचा पहिला आठवडा लोटला तरी अद्याप त्या तळ्यात मोरांसाठी पाण्याची सोय केली नसल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळू लागल्याचे वरूडे, गणेगाव, शास्ताबाद, लाखेवाडी परिसरात पाहावयास मिळतात. वनखात्याने या परिसरातील मोरांच्या पिण्याच्या पाण्याची दखल घेतली पाहिजे; अन्यथा येथील मोर दुर्मिळ ठरण्याची भीती आहे.चिंचोली मोराची येथे मोरांचे वास्तव्य जास्त असल्यामुळे या परिसरात मोर पाहण्यासाठी मुंबई, पुणे, नगर, बारामती परिसरातील पर्यटकही हजेरी लावतात. चिंचोली मोराची हे पर्यटनस्थळ असून या ठिकाणी छोटी-मोठी सहा ते सात पर्यटनस्थळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर तसेच शेतात तयार केली आहेत. सुट्टीचा दिवस पाहून या ठिकाणी पर्यटक शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ज्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत, त्या ठिकाणी पर्यटकांसाठी पाण्याची सोय तसेच झाडांची सावली केली आहे. तर काहींनी पर्यटनाच्या नावाखाली आपली दुकाने थाटली आहे.विद्युतीकरणामुळेही मोरांचा मृत्यू- चिंचोली मोराची, वरूडे, गणेगाव परिसरातून पॉवर ग्रीड कार्पोरेशन इंडिया प्रा. लिमिटेड या विद्युत कंपनीची हायव्होल्टेज लाईन गेली असून, झाडावर बसलेले मोर उडून खाली येताना या तारेला लागून त्यांचा अनेकदा मृत्यूदेखील झाला आहे. या ४०० किलोवॅटच्या तारेला घर्षण होताच मोराचा मृत्यू होतो आहे. मात्र कंपन्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

पर्यटनस्थळाच्या इमारती धूळ खात पडून - पर्यटनस्थळाच्या इमारती धूळ खात पडून असून, चिंचोली मोराची येथे महाराष्ट्र अ‍ॅग्रो टूरिझमतर्फे पर्यटकांना राहण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बांधकामे तयार केली आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी कुस्ती ग्राऊंड, पार्किंग इत्यादी इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र, इमारती १० वर्षांपासून धूळ खात पडलेल्या अवस्थेत दिसून येत असून, इमारतींपुढे उंच झाडे, काटेरी झुडपांची वाढ झालेली दिसून येत आहे.