शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री भरणे म्हणाले, 'जे मला निष्क्रीय म्हणतात, त्यांची किव करावाशी वाटते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 11:37 IST

भरणे म्हणाले, मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला तपासावे...

बारामतीविरोधकांवर इंदापुरकरांनी अनेक वर्ष विश्वास ठेवला. मात्र, त्यांच्या नाकर्तेपणामुळे गावांना रस्ते,पाण्याची सोय  नव्हती. अवर्षणग्रस्त गावांच्या वाट्याला तर वनवासच आला. या गावामध्ये सोयरिक करायला देखील कोणी तयार होत नसे, अशी या गावांची २०१२ पूर्वी गावांची स्थिती बिकट होती, अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( ncp dattatraya bharne) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil) यांचे नाव न घेता केली.

तालुक्यातील अकोले, लाकडी, काझड येथील १३ कोटी ६६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमीपूजन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भरणे बोलत होते. यावेळी भरणे पुुढे म्हणाले, विरोधक मतांसाठी पदरात पाडून घेण्यासाठी लाकडी-निंबोडी योजना मार्गी लावण्याचे खोटे आश्वासन दिले जात असे. मात्र, आता ही योजना आता मार्गी लागणार आहे, त्यासाठी आर्थिक तरतूद देखील केली आहे. या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील ११ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे भरणे यांनी नमुद केले.

काही जण मला निष्क्रीय म्हणतात. त्यांची किव करावाशी वाटते. माझे चारित्र हनन करण्याचा देखील प्रयत्न करतात माझी शेतजमीन, माझा व्यवसाय सर्वांनाच पूर्वीपासून माहिती आहे. मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला तपासावे. लोकांना १९९५ अगोदर त्यांची काय स्थिती होती. आज काय बदल झाला आहे, हे चांगलं कळतं. वैयक्तिक पातळीवर आल्यास आमच्याकडे देखील  खूप मसाला आहे. १९ वर्ष त्यांनी काम केले असते तर लोकांनी मला निवडून दिले नसते. त्यांनी काम केले नाही हे एका अर्थाने चांगले झाले. नाहीतर मला लोकांसाठी काम करता आले नसते,असा टोला देखील भरणे यांनी लगावला.

यावेळी प्रतापराव पाटील, सरपंच अजित पाटील  जिल्हा परिषद सदस्या हनुमंत बंडगर , प्रतापराव पाटील, बाळासाहेब पाटील, हनुमंतराव कोकाटे, रणजितसिंह निंबाळकर, सचिन सपकळ, विक्रमसिंह निंबाळकर, शुभम निंबाळकर उपस्थित होते.... सोलापूरमध्ये जाऊन काड्या केल्यासोलापूरचे ५ टीएमचे पाणी आपल्याला मिळाले तर आपल्याला मत मिळणार नाही, याच भीतीने आपल्याच तालुक्यातील नेत्याने सोलापूरमध्ये जाऊन काड्या केल्या, अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. सोलापूरकरांची यामध्ये काही चूक नाही. सोलापूरचे पाणी आपल्याला आणायचेच नव्हते, असे देखील भरणे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस