शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Exclusive: भाजपा-शिवसेना यांच्यात पुल बांधणार का?, गडकरींनी नेमकं उत्तर दिलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 23:29 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

पुणे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी मुलाखतीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर महत्वाचं विधान केलं आहे. राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील राजकीय द्वंद्व संपुष्टात येऊन भविष्यात पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये पुल बांधण्याचं काम नितीन गडकरीच करू शकतात असं विचारलं असता नितीन गडकरी यांनी स्पष्ट उत्तर दिलं. "जे पुल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तेच पुल मी बांधतो. सध्या मी नॅशनल हायवे बांधत आहे", असं उत्तर देत आपलं सध्या राष्ट्रीय राजकारणाकडेच लक्ष असल्याचं सूचित केलं.  

राजकारणातील सध्याच्या आक्रस्ताळेपणाबद्दल विचारलं असता गडकरींनी आपण एकमेकांच्या विचारांचे विरोधक होऊ शकतो पण शत्रू होऊ शकत नाही. विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता जास्त धोकादायक आहे, असं महत्वाचं विधान केलं. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी गडकरींनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यात पहिल्याच प्रश्नात गडकरींनी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. भाजपा आणि शिवसेना यांच्यात सध्या जो वितुष्ट निर्माण झाला आहे तो दूर करण्याचं काम फक्त नितीन गडकरीच करू शकतात असा विश्वास अनेकांना वाटतो. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील पुल गडकरी बांधणार का?, असं गडकरींना विचारण्यात आलं. त्यावर गडकरींनी एका क्षणात उत्तर दिलं. "जे पुल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तेच पुल मी बांधतो. माझ्याकडे सध्या राज्यातले आणि जिल्ह्यातले रस्ते बांधण्याचं काम नाही. मी नॅशनल हायवे बांधतो. मी बाकीच्या गोष्टींबद्दल फार विचार करत नाही. प्रत्येकजण त्या त्या गोष्टीसाठी सक्षम असतो", असं गडकरी म्हणाले. 

काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा"लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधी पक्ष. त्यामुळे माझी मनापासून इच्छा आहे की काँग्रेस पत्र मजबूत व्हायला हवा. पण सध्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस पक्षाची जागा एक स्थानिक पक्ष घेत आहे हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षानं मजबूत असणं खूप गरजेचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरु एक उत्तम उदाहरण आहेत. अटलबिहारी वाजपेयी निवडणूकीत पराभूत झाल्यानंतरही पंडितजींनी त्यांचा सन्मान केला होता. त्यामुळे लोकशाहीत विरोधी पक्षाचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि काँग्रेस पक्षानं मजबूत व्हायला हवं", असं नितीन गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना