शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत प्रदूषित पाणी? काळसर पाण्यामुळे चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 00:15 IST

विशिष्ट प्रकारचा वास : काळसर पाण्यामुळे चिंता

पळसदेव : पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्णातील शेतकरी, उद्योग, यांची तहान भागविणारे उजनी धरण १०३ टक्के भरले आहे. उजनी धरणात १८ धरणे व पुणे शहरातील पाणी येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा रंग हिरवट तसेच काळा दिसत आहे. पुणे शहरातून आलेल्या पाण्यामध्ये प्लॅस्टिक, पिशव्या, घनकचरा, इतर घाणीच्या वस्तू वाहून आल्या आहेत. त्यामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या वस्तूंचा खच साचला आहे.

पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी जेष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने तपासले होते. त्यावेळी हे पाणी पिण्यास तर सोडाच, मात्र हात धुण्यासाठी अथवा शौचालय वापरासाठीसुद्धा योग्य नसल्याचा ‘अभिप्राय’ दिला होता. हेच पाणी मच्छीमार, गुरे राखण करणारे, शेतकरी पित असतात. रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे वास्तव्य अधिक या ठिकाणी असते. उजनी धरण भरले असल्याने पक्ष्यांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केली आहे.गेली कित्येक वर्षांपासून उजनीच्या जलप्रदूषणचा विषय गाजत आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. वास्तविक पाहता, उजनीचे पाणी पिण्यास घातक असल्याचा दावा अनेक जलतज्ज्ञांनी केला आहे. अनेक ठिकाणी कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच साचलेला दिसला. तसेच पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवट तर काही ठिकाणी काळसर होता. वाहून आलेल्या वस्तू शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस खात असल्याने जनावरांना आजार उद्भवत आहेत. मात्र, उजनीच्या या जलप्रदूषाकडे राज्यकर्ते, शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Ujine Damउजनी धरणPuneपुणे