शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

उजनीत प्रदूषित पाणी? काळसर पाण्यामुळे चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 00:15 IST

विशिष्ट प्रकारचा वास : काळसर पाण्यामुळे चिंता

पळसदेव : पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्णातील शेतकरी, उद्योग, यांची तहान भागविणारे उजनी धरण १०३ टक्के भरले आहे. उजनी धरणात १८ धरणे व पुणे शहरातील पाणी येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा रंग हिरवट तसेच काळा दिसत आहे. पुणे शहरातून आलेल्या पाण्यामध्ये प्लॅस्टिक, पिशव्या, घनकचरा, इतर घाणीच्या वस्तू वाहून आल्या आहेत. त्यामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या वस्तूंचा खच साचला आहे.

पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी जेष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने तपासले होते. त्यावेळी हे पाणी पिण्यास तर सोडाच, मात्र हात धुण्यासाठी अथवा शौचालय वापरासाठीसुद्धा योग्य नसल्याचा ‘अभिप्राय’ दिला होता. हेच पाणी मच्छीमार, गुरे राखण करणारे, शेतकरी पित असतात. रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे वास्तव्य अधिक या ठिकाणी असते. उजनी धरण भरले असल्याने पक्ष्यांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केली आहे.गेली कित्येक वर्षांपासून उजनीच्या जलप्रदूषणचा विषय गाजत आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. वास्तविक पाहता, उजनीचे पाणी पिण्यास घातक असल्याचा दावा अनेक जलतज्ज्ञांनी केला आहे. अनेक ठिकाणी कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच साचलेला दिसला. तसेच पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवट तर काही ठिकाणी काळसर होता. वाहून आलेल्या वस्तू शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस खात असल्याने जनावरांना आजार उद्भवत आहेत. मात्र, उजनीच्या या जलप्रदूषाकडे राज्यकर्ते, शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Ujine Damउजनी धरणPuneपुणे