शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

उजनीत प्रदूषित पाणी? काळसर पाण्यामुळे चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 00:15 IST

विशिष्ट प्रकारचा वास : काळसर पाण्यामुळे चिंता

पळसदेव : पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्णातील शेतकरी, उद्योग, यांची तहान भागविणारे उजनी धरण १०३ टक्के भरले आहे. उजनी धरणात १८ धरणे व पुणे शहरातील पाणी येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा रंग हिरवट तसेच काळा दिसत आहे. पुणे शहरातून आलेल्या पाण्यामध्ये प्लॅस्टिक, पिशव्या, घनकचरा, इतर घाणीच्या वस्तू वाहून आल्या आहेत. त्यामुळे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या वस्तूंचा खच साचला आहे.

पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी जेष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने तपासले होते. त्यावेळी हे पाणी पिण्यास तर सोडाच, मात्र हात धुण्यासाठी अथवा शौचालय वापरासाठीसुद्धा योग्य नसल्याचा ‘अभिप्राय’ दिला होता. हेच पाणी मच्छीमार, गुरे राखण करणारे, शेतकरी पित असतात. रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे वास्तव्य अधिक या ठिकाणी असते. उजनी धरण भरले असल्याने पक्ष्यांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केली आहे.गेली कित्येक वर्षांपासून उजनीच्या जलप्रदूषणचा विषय गाजत आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. वास्तविक पाहता, उजनीचे पाणी पिण्यास घातक असल्याचा दावा अनेक जलतज्ज्ञांनी केला आहे. अनेक ठिकाणी कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच साचलेला दिसला. तसेच पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवट तर काही ठिकाणी काळसर होता. वाहून आलेल्या वस्तू शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस खात असल्याने जनावरांना आजार उद्भवत आहेत. मात्र, उजनीच्या या जलप्रदूषाकडे राज्यकर्ते, शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Ujine Damउजनी धरणPuneपुणे