शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

काेरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा पुरावा नाही : रवींद्र कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 19:59 IST

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुण्याचे माजी सहअायुक्त रवींद्र कदम यांच्या वार्तालापाचे अायेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी माअाेवादी अाणि एल्गार परिषद यांच्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली.

पुणे : शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी माअाेवाद्यांचा पैसा वापरला गेला अाहे. मात्र कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार आहे याबाबत कुठलेही पुरावे नाहीत. असा खुलासा पुण्याचे माजी पाेलिस सहअायुक्त रविंद्र कदम यांनी केला.  

    पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविंद्र कदम यांचा  ‘शहरी नक्षलवाद’ याविषयावर संवाद आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. पुण्यात 31 डिसेंबर राेजी अायाेजित केलेल्या एल्गार परिषदेला माअाेवादी संघटनांनी पैसै पुरवला असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. परंतु  एल्गार परिषदेच्या मंचावरील प्रत्येकाचा माअाेवाद्यांशी संबंध असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

      कदम म्हणाले, एल्गार परिषदेच्या अायाेजनात अनेक अॅंटी फॅसिस्ट फ्रंडच्या संघटनांचा सहभाग हाेता. या परिषदेला माअाेवाद्यानींच पैसा पुरविला होता. या परिषदेच्या माध्यमातून माअाेवाद्यांनी शहरात नेटवर्क निर्माण केले असून,  बुद्धधीवंत आणि उच्चशिक्षित तरूणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन लेखक सुधीर ढवळे व इतरांना अटक केल्यानंतर तपासामध्ये त्यांचे लँपटॉप, हार्डडिस्क जप्त करण्यात आली. पाेलिसांना जवळपास २५० पत्र पोलिसांना मिळाली आहेत. यामधून कुणी कसा पैसा या एल्गार परिषदेला पाठविला, याचे काही पुरावे मिळाले आहेत. या परिषदेच्या माध्यमातूनच भीमा कोरेगावचे संघटन करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यामध्ये झालेल्या दंगलीशी एल्गार परिषदेचा काही संबंध होता का? असे तपासातून समोर आले नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

    दुर्गम भागाप्रमाणेच शहरातही उपेक्षित घटक आहे, त्यांच्यामध्येही असंतोषाची ठिणगी पेटली आहे. याच असंतोषाला क्रांतीमधून प्रेरित करण्याचा प्रयत्न माअाेवाद्यांकडून केला जात आहे. राज्यात पाळमुळ रूजविण्यासाठी शहरातील माअाेवादीकेंद्र उपयोगी पडतील यासाठी २००७ नंतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर माअाेवादी कारवाया सुरू झाल्या. विद्यार्थी आणि बरोजगारांवर  लक्ष्य केंद्रित केले जात आहे. सशस्त्र क्रांतीमधून सत्ता प्रस्थापित करणे हे माअाेवाद्यांचे ध्येय आहे. माअाेवाद्यांच्या युनायटेड फ्रंटमध्येच अँटी फँसिस्ट फ्रंटचा ठराव करण्यात आला. त्याच फ्रंटच्या माध्यमातून पुण्यात एल्गार परिषद भरविण्यात आली. हिंसेची अपरिहार्यता निश्चित ध्येयापर्यंत पोहोचून देऊ शकत नाही, ही माअाेवाद्यांची मानसिकता आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचे समर्थन केले जात आहे. मात्र हिंसेच्या वापरातून प्रतिहिंसा तयार होते. हिंसेचे एक विषारी वर्तुळ आजूबाजूला निर्मित होते. त्यातून रक्त सांडते पण अंतिम ध्येय गाठणे शक्य होत नाही. हिंसेतून निर्माण झालेला बदल हा कायमस्वरूपी टिकू शकत नाही, याकडेही कदम यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाnaxaliteनक्षलवादीBhima-koregaonभीमा-कोरेगाव