शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनातील प्रत्येकाने आपण जनसेवा करतोय की शासन? याचा विचार करावा, देशाच्या पहिल्या माहिती आयुक्तांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:03 IST

आपण जनतेचे सेवक आहोत, राज्यकर्ते नाही. जे लोकांना हवं, तेच करायचं आहे

पुणे: सुशासन याचा अर्थ राज्य करणे असा होत नाही. तो फक्त एक भाग असून, सेवा करणे हा मुख्य भाग आहे. जे प्रशासन समस्याचं मूळ समजू शकतं, त्याला सुशासन म्हणता येईल. यानुसार प्रशासनातील प्रत्येकाने आपण जनसेवा करतोय की शासन? याचा विचार करावा. आपण जनतेचे सेवक आहोत, राज्यकर्ते नाही. जे लोकांना हवं, तेच करायचं आहे. त्यासाठी जनता सोबत असली पाहिजे, असे मत देशाचे पहिले माहिती आयुक्त, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबुल्लाह यांनी व्यक्त केले. देशात सुशासन यावे, असा कधी राजकीय अजेंडा बनला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

निमित्त होते, सरहद पुणेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे सोमवारी (दि. ११) आयोजित भारताचे माजी गृहसचिव स्व. डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यानाचे. यंदाचे हे तिसरे वर्ष असून, यात ‘सुशासन : कल्पना की वास्तव’ या विषयावर हबीबुल्लाह यांनी सविस्तर मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्य सचिव, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर होते. मंचावर सरहदचे संजय नहार, शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे, अनुज नहार उपस्थित होते.

हबीबुल्लाह म्हणाले की, सर्व माहिती जनतेला असली पाहिजे हा माझा आग्रह होता. प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांनाच काही माहिती नाही, जनता तर लांबची गोष्ट आहे. हे मला देशाचा माहिती आयुक्त झाल्यानंतर कळलं. माझे दरवाजे खुले होते; पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना काय काय करावं लागतंय. हे कळलंच नव्हतं. हे वास्तव अवाक् करणारे होते, असेही ते म्हणाले. लोकांमध्ये फूट पाडणे हा आतंकवाद्यांचा अजेंडा राहिला आहे. पहलगाममध्येदेखील त्यांना तेच करायचं होतं. हिंदू-मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, असे बिंबवले जात आहे. पण ते चुकीचे आहे. जनता उभी राहिली नाही म्हणून पाकिस्तानमध्ये लोकशाही येऊ शकली नाही, असे सांगून त्यांनी वास्तवाची जाणीव करून दिली.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणSenior Citizenज्येष्ठ नागरिक