शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: वाद झाले तरी संमेलन होत राहतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By श्रीकिशन काळे | Updated: January 31, 2025 16:13 IST

जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ फडणवीस यांची खुमासदार फटकेबाजी

पुणे: “मराठी साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असो, तिथे वाद निर्माण होतोच. संमेलन आणि वाद हे समीकरणच झाले. खरंतर मराठी माणासाचा वाद घालणे हा स्वभावच आहे. कारण आपण संवेदनशील, भावनाप्रधान लोक आहोत, त्यामळे वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊन चांगले काही तरी समोर येते, त्यामुळे वाद झाले तरी संमेलन होत राहतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून (दि.३१) तिसरे विश्व मराठी संमेलन सुरू झाले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाषामंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राजा दीक्षित, रवींद्र शोभणे, मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

मी पुन्हा येईन !

‘‘‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पिच्छाच सोडत नाहीय. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे शब्द बोलले जातात. काही काळापूर्वी हे उपहासाने म्हणायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो, तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ देखील बदलत जातात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ असे म्हणावे,”अशी खुमासदार फटकेबाजी फडणवीस यांनी केली.

अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे

‘‘संमेलनावर वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या एका पुस्तकात आहे. मराठी माणसाचे विविध गुण आणि अवगुण देखील त्यात आहेत. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, हे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे, अशी ठाम भूमिका फडणवीस यांनी घेतली.

साहित्यासाठी ‘एआय’ वापरा !

सध्या ‘एआय’चा बोलबाला आहे. आपण ‘एआय’च्या युगात आहोत, जर आपण या ठिकाणी ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’मध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले, तर येणाऱ्या पिढीला साहित्यिकांनी काय लिहिले आहे, हे समजेल. हे काम मराठी भाषा विभागाने करावे, त्यासाठी एआयचा वापर करावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.

परदेशातही संमेलन करू !

मराठी माणूस जगाच्या पाठीवर पोचला आहे. मला आनंद आहे की, आपण एकत्रित आहोत. आता हे विश्व संमेलन आपण परदेशातही करूया. त्यासाठी कुठलं शहर किंवा देश सोयीचे असेल, त्यावर चर्चा करू, असे सांगून परदेशात मराठी संमेलन घेऊन मराठी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजवू, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmarathiमराठीcultureसांस्कृतिक