शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: वाद झाले तरी संमेलन होत राहतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By श्रीकिशन काळे | Updated: January 31, 2025 16:13 IST

जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ फडणवीस यांची खुमासदार फटकेबाजी

पुणे: “मराठी साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असो, तिथे वाद निर्माण होतोच. संमेलन आणि वाद हे समीकरणच झाले. खरंतर मराठी माणासाचा वाद घालणे हा स्वभावच आहे. कारण आपण संवेदनशील, भावनाप्रधान लोक आहोत, त्यामळे वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊन चांगले काही तरी समोर येते, त्यामुळे वाद झाले तरी संमेलन होत राहतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून (दि.३१) तिसरे विश्व मराठी संमेलन सुरू झाले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाषामंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राजा दीक्षित, रवींद्र शोभणे, मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

मी पुन्हा येईन !

‘‘‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पिच्छाच सोडत नाहीय. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे शब्द बोलले जातात. काही काळापूर्वी हे उपहासाने म्हणायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो, तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ देखील बदलत जातात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ असे म्हणावे,”अशी खुमासदार फटकेबाजी फडणवीस यांनी केली.

अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे

‘‘संमेलनावर वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या एका पुस्तकात आहे. मराठी माणसाचे विविध गुण आणि अवगुण देखील त्यात आहेत. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, हे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे, अशी ठाम भूमिका फडणवीस यांनी घेतली.

साहित्यासाठी ‘एआय’ वापरा !

सध्या ‘एआय’चा बोलबाला आहे. आपण ‘एआय’च्या युगात आहोत, जर आपण या ठिकाणी ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’मध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले, तर येणाऱ्या पिढीला साहित्यिकांनी काय लिहिले आहे, हे समजेल. हे काम मराठी भाषा विभागाने करावे, त्यासाठी एआयचा वापर करावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.

परदेशातही संमेलन करू !

मराठी माणूस जगाच्या पाठीवर पोचला आहे. मला आनंद आहे की, आपण एकत्रित आहोत. आता हे विश्व संमेलन आपण परदेशातही करूया. त्यासाठी कुठलं शहर किंवा देश सोयीचे असेल, त्यावर चर्चा करू, असे सांगून परदेशात मराठी संमेलन घेऊन मराठी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजवू, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmarathiमराठीcultureसांस्कृतिक