शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Devendra Fadnavis: वाद झाले तरी संमेलन होत राहतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By श्रीकिशन काळे | Updated: January 31, 2025 16:13 IST

जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ फडणवीस यांची खुमासदार फटकेबाजी

पुणे: “मराठी साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असो, तिथे वाद निर्माण होतोच. संमेलन आणि वाद हे समीकरणच झाले. खरंतर मराठी माणासाचा वाद घालणे हा स्वभावच आहे. कारण आपण संवेदनशील, भावनाप्रधान लोक आहोत, त्यामळे वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊन चांगले काही तरी समोर येते, त्यामुळे वाद झाले तरी संमेलन होत राहतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून (दि.३१) तिसरे विश्व मराठी संमेलन सुरू झाले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाषामंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राजा दीक्षित, रवींद्र शोभणे, मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

मी पुन्हा येईन !

‘‘‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पिच्छाच सोडत नाहीय. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे शब्द बोलले जातात. काही काळापूर्वी हे उपहासाने म्हणायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो, तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ देखील बदलत जातात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ असे म्हणावे,”अशी खुमासदार फटकेबाजी फडणवीस यांनी केली.

अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे

‘‘संमेलनावर वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या एका पुस्तकात आहे. मराठी माणसाचे विविध गुण आणि अवगुण देखील त्यात आहेत. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, हे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे, अशी ठाम भूमिका फडणवीस यांनी घेतली.

साहित्यासाठी ‘एआय’ वापरा !

सध्या ‘एआय’चा बोलबाला आहे. आपण ‘एआय’च्या युगात आहोत, जर आपण या ठिकाणी ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’मध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले, तर येणाऱ्या पिढीला साहित्यिकांनी काय लिहिले आहे, हे समजेल. हे काम मराठी भाषा विभागाने करावे, त्यासाठी एआयचा वापर करावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.

परदेशातही संमेलन करू !

मराठी माणूस जगाच्या पाठीवर पोचला आहे. मला आनंद आहे की, आपण एकत्रित आहोत. आता हे विश्व संमेलन आपण परदेशातही करूया. त्यासाठी कुठलं शहर किंवा देश सोयीचे असेल, त्यावर चर्चा करू, असे सांगून परदेशात मराठी संमेलन घेऊन मराठी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजवू, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmarathiमराठीcultureसांस्कृतिक