शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आशा सेविकांना मानधन वाढवून देण्यासाठी सरकार मागेपुढे पाहते, हे अत्यंत खेदजनक - तानाजी सावंत

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: April 23, 2023 17:13 IST

शासनाच्या आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर काम करावे लागण्याची आवश्यकता

पुणे : शंभर कोटींचा प्रकल्प असताना त्या प्रकल्पाला दिरंगाई झाल्यामुळे तो प्रकल्प पाचशे कोटींपर्यंत जातो आणि सरकार त्या ठेकेदाराला अतिरीक्त पैसे देते. ज्या आशा वर्कर्स उन्हातान्हाची तमा न बाळगता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुविधा पुरविणाऱ्या आरोग्यदूत म्हणून काम करणाऱ्या आशा सेविकांना हजार-दोन हजार मानधन वाढवून द्यायचे म्हटले तरी सरकार मागेपुढे पाहते, हे खेदजनक आहे, असे म्हणत विदयमान आराेग्यमंत्रयांनी शासनालाच घरचा आहेर दिला.

जनसेवा फौंडेशन संचालित अनाथ निराधार पुनर्वसन केंद्रातर्फे रविवारी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. सुभाष सांळुके यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकार 1500 रूग्णवाहिका घेणार 

सध्या आरोग्य खाते हे लाल फितीच्या कारभारात अडकले असून शासनाच्या आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनोवृत्तीपासून ते सेवासुविधांपर्यंत सर्वच पातळ्यांवर काम करावे लागण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात सर्व सेवा सुविधांनी युक्त 1500 रूग्णवाहिका राज्य सरकार घेणार असून त्याचबरोबर एअर अँब्युलन्सची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

 अधिका-यांवरही नाराजी

माता सुरक्षित, जागरूक पालक-सुदृढ बालक किंवा नंदुरबार आदिवासी पट्ट्यामधील कुपोषण कमी व्हावे म्हणून आखून दिलेला 44 कलमी कार्यक्रम या सर्वच योजना आखून दिल्यानंतरही आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी त्या धोरणांची आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत नाहीत, अशा प्रकारे त्यांनी त्यांच्याच खात्यावरील अधिका-यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच राजस्थानातील राईट टू लव्ह कायदा महाराष्ट्रातही राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTanaji Sawantतानाजी सावंतHealthआरोग्यGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल