शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"परवानगी नाही दिली तरी उपोषणाला बसणार"; मुंबईच्या आंदोलनावर जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:06 IST

जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे दाखल होणार आहे.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील मोर्चाचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी अंतरावाली सराटीतून पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढाईला सुरूवात केली असून अहमदनगरमार्गे ते मुंबईला जात आहेत. आज जरांगेंचा ताफा पुण्यात पोहोचला असून उद्या पिंपरी चिंचवडमध्ये मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी सरकारकडून विविध अधिकारी पाठवून त्यांची समजूत घातली जात आहे. 

जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे दाखल होणार आहे. रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत. तत्पूर्वी सरकारकडून त्यांची रॅली थांबवण्यासाठी समजतू घातली जात आहे. पुण्याजवळ आले असता सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना आपला निर्णय बदलण्याची विनंती केली. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रांजणगावहून निघून नगररोडने कोरेगाव भिमामार्गे खराडीत मुक्काम केला. तेथून ही पदयात्रा खराडी बायपास- पुणे स्टेशन-  औंध गाव-  रक्षक सोसायटी - काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड स्टेशन - आकुर्डी - निगडी देहूरोड -(जुना एक्सप्रेस वे ने)- लोणावळा मुक्कामी जाणार आहे. जरांगेंच्या या रॅलीला मराठा समाजाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या रॅलीतील सहभागी मराठ्यांच्या राहण्यासाठी, जेवणासाठी व इतर गोष्टींसाठी नियोजन केलं जात आहे. जरांगे पाटील आज पुण्यात आले असून उद्या पुण्यातून मुंबईकडे निघणार आहेत. तत्पूर्वी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आजच चर्चा करणार आहोत, त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर विचार करावा, अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांकडून जरांगेंना करण्यात आली. मात्र, आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत. दोन दिवसांत मराठा आरक्षण न मिळाल्यास २६ जानेवारीपासून आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत. सरकारने परवानगी दिली तरी, आणि नाही दिली तरी आपण उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे, जरांगे हे त्यांच्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.  

पुण्यात वाहतून वळवली

पुणे शहर वाहतुक विभागाच्या वतीने दि. २३ रोजी दुपारी ३. ०० वा पासुन आवश्यकतेनुसार अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील मुंबई पुणे महामार्गावरील कोल्हापूर सातारा येथून येणारी अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडीमशीन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला नावे शिरूर मार्गे वळविण्यात आले आहे. त्यानंतर वाघोली लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा सोलापूर रोड येथून वाहतूक केडगाव चौफुला नावरा मार्गे ते शिरूर आशी वळवण्यात येणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण