शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मीरमध्ये सर्व आलबेल नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:00 IST

केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर मुलांच्या भविष्याचे काय, शेती, रोजगार, पर्यटन याविषयीचे धोरण कुठले ? असा सवाल लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी उपस्थित केला.

पुणे : जम्मु काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरही त्याठिकाणी सर्व आलबेल आहे असे समजणे चुकीचे आहे. अद्याप तेथील सामाजिक वास्तवाची कल्पना इतर राज्यांतील सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही. विकासाच्या नावाखाली करण्यात आलेले बदल नेमक्या कुणाचे फायद्याचे ठरणार याबाबत साशंकता आहे. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर मुलांच्या भविष्याचे काय, शेती, रोजगार, पर्यटन याविषयीचे धोरण कुठले ? असा सवाल लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी उपस्थित केला.

           पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  ‘कलम ३७० आणि लडाख'  या विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिझवी म्हणाले, कारगील आणि लडाख मधील खरी परिस्थिती वेगळी आहे. पर्यटनाशिवाय त्याठिकाणी दुसरा रोजगार नाही. अशावेळी इतर उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्राकडून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. काश्मिरमध्ये कलम 370 लागु केल्यानंतर सर्व परिस्थितीत फरक पडला असे नाही. सध्या कारगील, लडाख येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. नवीन शासननियमानुसार तेथील बोर्ड रद्द झाले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी कुठल्या बोर्डव्दारे प्रवेश घ्यावा असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता जम्मु काश्मिरमध्ये जावे लागते. मात्र पुढील शिक्षणाचे काय? याविषयी कुणी बोलण्यास  तयार नाही. सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे. इंटरनेट बंद आहेत. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे.           तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेती, व्यापार, यांच्याविषयी अद्याप कुठलेही धोरण केंद्र सरकारकडून तयार करण्यात आले नाही. म्हणून तर लेह, लडाख मधील नागरिकांना आपल्या जमिनींचा व्यवहार करताना बारकाईने विचार करावा लागणार आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय व्यवस्थापनाचा ढिसाळपणा लडाख आणि कारगीलमधील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांमध्ये सातत्याने हददीचा वाद होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील येणारा भविष्यकाळ आमच्याकरिता आनंदाचा असेल. मात्र त्याकरिता लढण्याची क्षमता शेवटपर्यंत टिकवून ठेवता यायला हवी. असेही रिझवी म्हणाले.  

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर