शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे, नल्लामुथ्थू यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 3:34 AM

डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

पुणे - डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आॅनलाईनच्या जमान्यात चित्रपट, माहितीपट हे माध्यम सर्वांत प्रभावी ठरू शकते. मात्र, भारतामध्ये पर्यावरण, वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही, अशी खंत दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थू यांनी गुरुवारी व्यक्त केली.किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक आणि छायाचित्रकार नल्लामुथ्थू यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी पार पडले. यावेळी माधव चंद्रचूड, महोत्सवाचे अध्यक्ष वीरेंद्र चित्राव, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, परिणीता दांडेकर, गुरमित सपल, विभूती देववर्मा उपस्थित होते.विभूती देववर्मा यांना (संस्था), गुरमीत सपल (चित्रपट निमार्ता), परिणिता दांडेकर (कार्यकर्त्या) यांना यावेळी किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.विभूती देववर्मा म्हणाले, ‘जंगलात राहून जंगल वाचवून संशोधन, जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम सुरू करताना प्रारंभी खूप अडचणी आल्या. मात्र, हळूहळू बरेच तरुण पुढे येऊ लागले. लहानसहान प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे, हाच मूळ उद्देश आहे. त्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.’गुरमीत सपल म्हणाले, ‘चित्रपट निर्माता म्हणून पर्यावरण आणि वन्यजीवनाशी खूप जवळचा संबध आला. आजकाल सकाळी उठल्या उठल्या पर्यावरणाचा ºहास झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. पृथ्वीवरील आपले भविष्य असुरक्षित आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर कलेतून जनजागृती घडवणे आवश्यक आहे. यातून भविष्यात चांगले परिणाम पहायला मिळतील, अशी आशा वाटते.’ परिणीता दांडेकर म्हणाल्या, ‘नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. मेट्रो, बंधारे, रस्ते अशा अडथळ्यांनी नद्यांवर आक्रमण केले जात आहे. जीवित नदी हे नागरीकरणाचे आणि जीवित जगाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांचे जतन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.’ 

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे