शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बांधकामासाठीची पर्यावरण परवानगी प्रक्रिया होणार सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 19:26 IST

प्रकल्पांना दिरंगाई होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने अध्यादेश काढून स्थानिक संस्थांना आता पर्यावरण मंजुरीचे अधिकार दिले आहेत.

ठळक मुद्देसुलभ स्थानिक संस्थांना मंजुरीचे अधिकार कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्नएका प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केवळ पर्यावरण मंजुरीमुळे तब्बल तीन वर्षांपर्यंत लांबत असे..

पुणे : अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे बांधकाम प्रकल्पांना पर्यावरणासंबंधी परवानगी मिळविण्यास विलंब लागत होता. मात्र, केवळ याकारणाने प्रकल्पांना दिरंगाई होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने अध्यादेश काढून स्थानिक संस्थांना आता पर्यावरण मंजुरीचे अधिकार दिले आहेत. तसेच २० हजार चौ.मी ते ५० हजार चौ.मी च्या प्रकल्पांची मंजुरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय यात घेण्यात आला आहे. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून कार्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे क्रेडाई महाराष्ट्रानेही स्वागत केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, एका प्रकल्पाच्या मंजुरीसाठी लागणार एक ते दीड वर्षांचा कालावधी केवळ पर्यावरण मंजुरीमुळे तब्बल तीन वर्षांपर्यंत लांबला जायचा. पर्यावरणाच्या परवानगीच्या नावाने आठ ते दहा महिने प्रकल्प विलंब तर मोठे आर्थिक नुकसान व्हायचे.तसेच यापूर्वी राज्याच्या राजधानीत ही परवानगी घेण्यासाठी यावे लागत होते ते यामुळे वाचणार आहे. परिणामी, बांधकाम खर्च वाढल्याने त्याचा थेट परिणाम घरांच्या किंमतीवर व्हायचा. या काळात बांधकाम व्यावसायिकांची गुंतवणूक अडकून पडायची, अशाप्रकारे गुंतवणूक अडकणे, हे अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरायचे. पर्यावरण देखील महत्त्वाचेच आहे. पण या प्रक्रियेत सुलभता येणेही तितकेच आवश्यक होते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रेडाईच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे अनेकदा पाठपुरावाही करण्यात आला होता. त्यामुळेच या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राच्या विकासात आड येणारी मोठी समस्या दूर झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. तसेच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेनुसार हाती घेण्यात आलेल्या २०२२पर्यंत सर्वांना घरे या उपक्रमासही गती प्राप्त होईल, असेही कटारिया यांनी नमूद केले.

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरण