शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पर्यावरण आॅलिम्पियाडला १६ आॅगस्टपासून सुरूवात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 19:43 IST

शाळांमध्ये पर्यावरण विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन नाही, या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक गटातील पहिल्या १००० विद्यार्थ्यांना दुस-या व अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार या स्पर्धेसाठी  ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषेमध्ये ही स्पर्धा

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी तेर पॉलिसी सेंटरकडून आॅलिम्पियाड स्पधेर्चे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी १६ आॅगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून  या स्पर्धेसाठी  ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली आहेत. या स्पधेर्साठी शाळेत किंवा कुठल्याही सेंटरवर जाण्याची गरज नाही.  www.terregree संकेतस्थळावर ही परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायची आहे. हे संकेतस्थळ १६ सप्टेंबरपर्यंत  स्पधेर्साठी खुले राहणार आहे. एक महिन्याच्या अवधीत चोवीस तासात कधीही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहेत, हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष विनिता आपटे यांनी ही माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या, आज शाळांमध्ये पर्यावरण विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन नाही, या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची गोडी वाढावी आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयीची जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. इयत्ता ५वी ते ९वी करिता  रोप,१० वी ते १२ वी साठी  वनस्पती आणि प्रथम ते तृतीय वर्षांसाठी झाड अशी विभागणी करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीमधून प्रत्येक गटातील पहिल्या १००० विद्यार्थ्यांना दुस-या व अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या फेरीत रोप आणि वनस्पती या गटातील प्रथम वीस येणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत इंटर्नशीप करण्याची किंवा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषेमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. तीस मिनिटांच्या वेळेत ५० प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. ----------------------------------------------------पुण्या-मुंबईकडून स्पर्धेला प्रतिसाद कमीगेल्या तीन वर्षांपासून दक्षिण प्रांत आणि जम्मू काश्मीर भागातल्या शाळांमधून स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण महाराष्ट्रामध्ये इतर भागांपेक्षा पुण्या-मुंबईमध्ये स्पर्धेला प्रतिसाद कमी मिळतो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंटरनेटच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना आॅनलाईन स्पर्धा देणे शक्य होत नाही. यासाठी  त्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे विनिता आपटे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेenvironmentवातावरणStudentविद्यार्थी