शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पुणे शहरातील बीआरटी बंद नको, सक्षम करा; वाहतूक तज्ज्ञांचा आयुक्तांच्या भूमिकेला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 13:23 IST

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी हा उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुळात सर्व अभ्यासाअंतीच शहरात बीआरटीला सुरूवात आतापर्यंत बीआरटीवर कोट्यावधी रुपये खर्चसातारा रस्ता बीआरटीचे कोट्यावधी रुपये खर्चुन पुर्नविकासाचे काम सुरू

पुणे : बीआरटीमुळे वाहतूककोंडी सुटली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या भूमिकेवर वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी बंद करण्याऐवजी ती अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बीआरटी सुरू करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांशीच चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा चर्चा कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना गायकवाड यांनी बीआरटीबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ‘बीआरटी मार्गातून सलग बस जात नाही. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी झाली नाही. त्यामुळे याचा फेरविचार करावा लागेल. शहरात ८० टक्के दुचाकी वाहने आहेत. या वाहनांना बीआरटी मार्गातून प्रवेश देता येईल का?, यावर तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल. चर्चा करूनच बीआरटी बाबत निर्णय घेऊ, अशा स्पष्ट शब्दांत गायकवाड यांनी बीआरटीला रेड सिग्नल दिला आहे. यावर वाहतूक तज्ज्ञांसह पीएमपी प्रवासी संघटनांनीही टीका केली आहे. बीआरटी बंद करून वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. उलट बीआरटी अधिक सक्षम करण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी हा उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मुळात सर्व अभ्यासाअंतीच शहरात बीआरटीला सुरूवात करण्यात आली. आता पुन्हा तज्ज्ञांशी चर्चा करून काहीच साध्य होणार नाही. खासगी वाहनांना प्रोत्साहन दिल्यास कोंडीत अधिकच भर पडेल. आतापर्यंत बीआरटीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने बस खरेदी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत बीआरटी बंद करणे चुकीचे ठरेल, असे तज्ज्ञांनी नमुद केले.-------------सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बीआरटी चांगली आहे. ती अधिक सक्षम करण्यासाठी अट्टाहास हवा. योग्यप्रकारे अंमलबजावणी न झाल्याने शहरात बीआरटी अयशस्वी ठरली, हे अधिकाºयांनी मान्य करायला हवे. पुणेकरांचे कोट्यांवधी रुपये खर्च होत असताना प्रशासकीय व्यवस्था डोळे व तोंड बंद करून बसली होती का? बीआरटी बंद केली तर ही सर्व पुणेकरांची केलेली घोर फसवणूकच होईल. करदात्यांच्या पैशावर टाकलेला मोठा दरोडा असेल. आयुक्तांनी तात्पुरता पर्याय शोधण्यापेक्षा बीआरटीच्या माध्यमातून दीर्घकालीन विचार करायला हवा.- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच...........सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून शहरातील ८० टक्के प्रवासी वाहतूक व्हायला हवी, असे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी बीआरटीला प्राधान्य द्यायलाच हवे. त्याशिवाय ही व्यवस्था सक्षम होणार नाही. बीआरटी सुरू झाली तेव्हा १२ टक्के प्रवासी हे दुचाकी सोडून बसकडे वळले होते. एका बसमधून जवळपास ८० प्रवासी ये-जा करू शकतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी इतर खासगी वाहनांच्या तुलनेतच बसचे महत्व खूप आहे. एकुण १०० किलोमीटर बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. सातारा रस्ता बीआरटीचे कोट्यावधी रुपये खर्चुन पुर्नविकासाचे काम सुरू आहे. गणेशखिंड रस्त्यावर बीआरटी प्रस्तावित आहे. ही कामे अधिक वेगाने पुर्ण करण्याऐवजी बीआरटीच बंद करणे योग्य नाही. खासगी वाहनांचे कितीही लाड केले तरी वाहतूक कोंडी सुटणार नाही. २०१५ मध्ये सर्व अभ्यास करूनच बीआरटी सुरू करण्यात आली. विकास आरखड्यासह इतर अहवालांमध्ये बीआरटीला प्राधान्य देण्यात आले. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. त्यामुळे बीआरटी बंद करणे चुकीचे ठरेल.- प्रांजली देशपांडे, वास्तुविशारद व वाहतूक नियोजनकार-----------

बीआरटीमुळे वाहतूक कोंडी सुटलेली नाही, असे आयुक्तांचे मत आहे. मुळात आपण बीआरटी व्यवस्थित केलीच नसताना असा निष्कर्ष कसा काढता येईल? वाहतूक कोंडी ही खासगी वाहनांच्या भरमसाठ वाढीमुळे झाली आहे. तिच्यावर नियंत्रण आणायला आपण काय केले? उदा. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली का? दुचाकींसाठी फ्री वे केल्यास त्यांचा वापर अजून वाढेल. मग कोंडी कमी होईल का? बीआरटी सारखे प्रकल्प सर्वसाधारण सभेने मंजूर केले आहेत, ते काही विचार करूनच. केवळ एका अधिकाºयाच्या मतानुसार त्यांचा फेरविचार करता येणार नाही.- हर्षद अभ्यंकर,सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका