शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दडपण न घेता उजळणी करण्यावर भर द्यावा; UPSC आणि MPSC च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 19:22 IST

स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आलं तरी खचून न जाता करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या बी-प्लॅनकडे पाहायला हवं

तानाजी करचे

पुणे: यूपीएससी आणि एमपीएससीची पूर्वपरीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्त परीक्षा कोणतीही असो, ती जसजशी जवळ येते तसतसे परीक्षार्थींच्या मनावरचा ताण वाढत जाताे. त्यामुळे उडालेल्या गाेंधळातून वर्षभर केलेल्या तयारीला सुरुंग लागण्याची दाट शक्यता असते. असे विद्यार्थी अगदी परीक्षा केंद्राच्या आत जाईपर्यंत हातात पुस्तक घेऊन वाचन करताना दिसतात. विशेष म्हणजे पूर्वी परीक्षा देऊनही ते प्रचंड दडपणाखाली असल्याचे दिसतात. येत्या काही दिवसांतच केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयाेगाच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी, परीक्षेची तयारी कशी करायला हवी, याबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी लोकमत प्रतिनिधी तानाजी करचे यांनी साधलेला संवाद.

प्रश्न - स्पर्धा परीक्षार्थींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत रिक्त हाेणाऱ्या जागांचा विचार करून त्यांना काय सांगाल?

उत्तर - प्रत्येक विद्यार्थ्यांची चॉइस असते, त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जरी वाढत असली तरी विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टिकोनातून बी-प्लॅन मात्र तयार करावा. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता ही एक टक्क्यापेक्षाही कमी असते. जरी स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आलं तरी खचून न जाता करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या बी-प्लॅनकडे पाहायला हवं.

प्रश्न - पूर्वपरीक्षा जवळ आली आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं?

उत्तर - परीक्षा जवळ आली तर विद्यार्थ्यांनी नवीन काही वाचू नये. वर्षभर जे तुम्ही वाचलं आहे त्याची उजळणी करावी. अभ्यासक्रम एवढा मोठा आहे की तुम्ही नवीन काही वाचायचं ठरवलं तर तो कधीच संपणार नाही. एकाच विषयाची पाच पुस्तक वाचण्यापेक्षा त्या विषयाचा एकच दर्जेदार संदर्भग्रंथ निवडा आणि तो पाच वेळा वाचा.

प्रश्न : दडपण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?

उत्तर : विद्यार्थ्यांमध्ये थोड्या प्रमाणात दडपण असायला हवं. जर दडपण नसेल तर विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत; परंतु जास्त दडपण असेल तर आपण जो अभ्यास केला आहे तो वाया जातो. सध्या तरी पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी रिलॅक्स राहायला हवं. जास्त ताणतणाव न घेता केलेल्या अभ्यासाची उजळणी करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा.

प्रश्न : स्पर्धा परीक्षा तयारीत खासगी क्लासचे किती महत्त्व आहे? ताे लावायलाच हवा का?

उत्तर : हे विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. असे कितीतरी विद्यार्थी आहेत, जे गावांमध्ये राहून अभ्यास करून अधिकारी झाले आहेत. क्लास लावूनही अधिकारी होता येतं आणि क्लास न लावताही अधिकारी होता येतं. फक्त विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची तयारी हवी.

प्रश्न : पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी एकत्रित कशी करावी?

उत्तर : काही विद्यार्थी मुख्य आणि पूर्वपरीक्षेचा अभ्यास सोबत करतात, तर काही पूर्वपरीक्षेचा अगोदर करतात. नंतर मुख्य परीक्षेचा करतात; परंतु साधारणत: जी परीक्षा आता सध्या विद्यार्थ्यांसमोर आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे.

प्रश्न : पूर्वपरीक्षेचा पेपर देताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

उत्तर :- पूर्व परीक्षेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे. जो प्रश्न तुम्हाला येणार नाही, त्या प्रश्नांमध्ये अडकून पडू नये. सुरुवातीला जे प्रश्न सोपे वाटतात आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येते, असे प्रश्न सोडवण्यावर जास्त भर द्यावा. वेळेचे नियोजन करण्यासाठी वर्षभर आपण पाठीमागील जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायला हव्यात.

प्रश्न : अभ्यासाचे नियोजन कसे?

उत्तर : अभ्यास करण्याची प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वेगवेगळी असते; परंतु अभ्यासामध्ये सातत्य असायला हवं. आपण दिवसभर काय वाचन केलं, ते संध्याकाळी एकदा पाहायला हवं. मी स्वतः ८ ते ९ तास अभ्यास करत होतो.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीEducationशिक्षण