शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचीही 'बोंब'; पालक व विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा नाहक मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 20:16 IST

दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य मंडळाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळही बंद पडले.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरू केले संकेतस्थळबुधवारी सकाळपासून तांत्रिक कारणांमुळे पडले बंद

पुणे: दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य मंडळाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळही बंद पडले. त्यामुळे निकालनंतर अकरावी सीईटी प्रक्रियेतही मंडळ नापास झाले. परंतु,संकेतस्थळ बंद पडल्याने पालक व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र,एकाच वेळी लाखो विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देत असल्याने सर्व्हरवर ताण आला. परिणामी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निकालाच पाहता आला नाही. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

मात्र,आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरू केलेले संकेतस्थळ बुधवारी सकाळपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडले.राज्यात प्रथमच अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे १ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.राज्य मंडळाने प्रसिध्द केले हेल्पलाईन क्रमांकही बंद होते.त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला.    

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, तांत्रिक कारणामुळे सीईटी प्रवेश अर्जाचे संकेतस्थळ बंद आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळविले जाईल. तसेच सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल. त्याचप्रमाणे हेल्पलाईन क्रमांक सुरू ठेवण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या जातील.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालGovernmentसरकारVarsha Gaikwadवर्षा गायकवाड