शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणे जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पूर्ववत : महावितरणची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:38 IST

पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले..

ठळक मुद्दे पुराचे पाणी ओसरल्यानंतर युद्धपातळीवर काम

पुणे : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या भागांना फटका बसल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील सुमारे साठ हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नदीतील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेत, बुधवारी (दि. ७) दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात यश मिळविले. मात्र, कृषी पंपाचा वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. महावितरणच्या तांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाणेर व बोपोडीतील ४ व रास्ता पेठ येतील ७ रोहित्रांचा वीजपुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करता आला नाही. ४० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी खंडित करावा लागला. त्यामुळे औंध, बाणेर, बालेवाडी, बावधन, खडकी, बोपोडी, पीएमसी बिल्डिंग परिसर, जुनी सांगवी, मधुबन सोसायटी, पिंपळे गुरव, चिंचवड, संजय गांधीनगर, कासारवाडी, वाकड, कस्पटे वस्ती, पवनानगर, पिंपळे निलख, काळेवाडी, शिवतीर्थ, विश्रांतवाडी, वडगावशेरी, कोंढवा, पिसोळी, मांजरी व मुंढवा परिसर अंधारात गेला. मुळशी तालुक्यातील गावे, पूर्व हवेलीतील भाग, उरुळी कांचन, मांजरी, आष्टापूर, रीहे, पौड, लोणी व थेऊर या भागातील बत्ती गुल्ल झाली होती......मंगळवार संध्याकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. रात्रीच्या वेळेस काम करून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत होते. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊसDamधरण