शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra | बिगुल वाजला ! ३० जूनपूर्वी हाेणार २१ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:04 IST

सहकारी संस्था, बँका, साखर कारखाने अशा सुमारे २१ हजार संस्थांचा समावेश...

पुणे : राज्यातील ज्या सहकारी संस्थांचा कार्यकाळ एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान संपल्या आहेत, त्यांच्या निवडणुका ३० जूनपर्यंत घेण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. त्याची प्रक्रिया येत्या एक मार्चपासून सुरू करून येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यात प्रशासक अथवा प्रशासकीय मंडळ असलेल्या सहकारी संस्था, बँका, साखर कारखाने अशा सुमारे २१ हजार संस्थांचा समावेश आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन वर्षांच्या काळात मुदत संपलेल्या कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. त्यामध्ये सर्व प्रशासक, प्रशासकीय मंडळ नियुक्त सहकारी संस्था, हंगामी समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा समावेश आहे.

येत्या १ मार्चपासून या निवडणूक प्रक्रिया सुरू करून येत्या दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेवरील न्यायालयाची स्थगिती किंवा इतर सक्षम प्राधिकाऱ्यांचे विशिष्ट संस्थेबाबत आदेश असल्यास अशा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अशा संस्थांच्या मतदार याद्या एक फेब्रुवारीपर्यंत मुदतीच्या आधारावर करण्यात याव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या संचालक मंडळांची मुदत लवकर संपली आहे, त्या क्रमाने त्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच कृषी सहकारी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी ही प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या संस्था निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत, अशा संस्थांवर कारवाई करण्यात यावी, असेही खंडागळे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात २०२० पूर्वीच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळपास पूर्ण झाल्या आहेत. आता २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांमधील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यात २१ हजार संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत.

- डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र