शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका आल्यात ; आता राम मंदिराचा प्रचार सुरु होईल : उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:02 IST

राम मंदीर, ३७० कलम, समान नागरी कायदा या घोषणा याआधीही दिल्या होत्या, केले मात्र काहीच नाही : उद्धव ठाकरे

ठळक मुद्देविद्यापीठाचा गोंधळ दुर्लक्षित व्हावा यासाठी भगवदगीतेचा विषय.. मी स्वत:ही जिओ विद्यापीठ शोधतो आहे ..... नाणार प्रकल्पाला कायमच विरोध राहणार

पुणे: निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी नेहमीच घोषणा देत असते. पण त्या फसव्या असतात. ३७० कलम, समान नागरी कायदा या घोषणा याआधीही दिल्या होत्या, केले मात्र काहीच नाही. त्यांनी आता २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर बांधणार असा प्रचार सुरू केला आहे. भाजपा हा फसव्या घोषणा करणारा पक्ष आहे. परंतु, ज्याप्रमाणे नोटाबंदी एका क्षणात केली मग राममंदिर का नाही करत असा खडा सवाल उपस्थित करत   निवडणुकाजवळ आल्या आहेत, आता ते राम मंदिराचा प्रचार प्रकर्षाने सुरु करतील, अशा खरमरीत शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला. 

पक्षाच्या कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात आलेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यातही त्यांनी भाजपा सोडले नाही. तब्बल दोन वर्षांनी पुण्यात आलो आहे असे म्हणत त्यांनी पुण्याकडे थोडे दुर्लक्षच झाले अशी खंतही व्यक्त केली.केंद्र तसेच राज्यातील भाजपाच्या सरकारच्या कारभारावरून ते स्वप्न दाखवत आहेत असेच वाटते आहे. स्वप्न पुर्ण झाली नाही की जनता काय करते हेही त्यांना समजेल. पक्ष वाढवणे हे माझे कर्तव्यच आहे. त्यासाठी त्यांना काय वाटेल याची काळजी मी करत नाही, करणार नाही. जनतेच्या अपेक्षा पुर्ण करणाऱ्यांच्या मागे जनता उभी राहते यावर माझा विश्वास आहे असे ठाकरे म्हणाले. पुण्यात थोडी बेदिली होती, मात्र आता भक्कम एकी झाली आहे. तसे सर्वांनी मला सांगितले आहे. त्यामुळे आता पुण्याकडे बारकाईने लक्ष देणार आहे असे ते म्हणाले.नाणार प्रकल्पाला विरोध का यावर बोलताना ठाकरे म्हणाले, या प्रकल्पामुळे कोकण कोकण राहणार नाही एवढेच सांगतो. आमचा विरोध त्यासाठी आहे. नाणारमुळे समृद्धी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र निसर्गाचा विध्वंस करून येणारी समृद्धी आम्हाला नको आहे. आमचा या प्रकल्पाला कायमच विरोध राहणार आहे. तो मागे घेण्याचा प्रश्नच नाही.विद्यापीठाचा गोंधळ दुर्लक्षित व्हावा यासाठी भगवदगीतेचा विषय काढला असावा. मी स्वत:ही त्यांनी सांगितलेले जिओ विद्यापीठ शोधतो आहे असे ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये राहून सरकारशीच कसे काय भांडता असे विचारले असता आम्ही स्वार्थासाठी भांडत नाही तर जनहितासाठी भांडत आहोत असे सांगितले. सरकारमध्ये आहे म्हणजे त्यांनी कसेही करावे व आम्ही ते मान्य करावे असे होत नाही. जे हिताचे आहे तेच मान्य करणार असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा