शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

PMC Division: एकनाथ शिंदेंची राजकीय खेळी; पुणे महापालिकेचे विभाजन, फुरसुंगी - उरुळीसाठी नवीन नगरपालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:31 IST

गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या.

पुणे : पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेमधून वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची एकत्रित नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. येत्या दोन आठवड्यांत यासंदर्भातील आदेश काढण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे होती. या दोन गावांसह ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम पालिकेकडून सुरू असून, अंतिम टप्प्यात आले आहे, तसेच पालिकेच्या वतीने या गावांमध्ये तीन टीपी स्कीमदेखील राबविण्यात येत आहे. गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे महापालिका सुविधा देत नसल्याने ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली.

होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख उपस्थित होते.

पालिकेचे क्षेत्रफळ कमी होणार पुणे महापालिकेमध्ये ११ गावे आणि त्यानंतर पालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरली होती; पण आता ही दोन गावे वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची लोकसंख्या अडीच लाख आहे. त्यामुळे पालिकेचे क्षेत्रफळ कमी होणार आहे.

नागरिकांना दिलासाफुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नागरिकांकडून पालिका मोठ्या प्रमाणात कर आकारणी करीत होती. पालिका नागरिकांकडून अक्षरश: जिझिया कर वसूल करीत होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता नगरपालिका झाल्यामुळे नागरिकांना मिळकत कर कमी होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीला फटकाहडपसर महापालिका करावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी मागे पडली आहेत. आता ही गावे वगळल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. पालिकेच्या प्रभागरचनेत या गावांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली असती. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असता.

नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी नगरपालिकेच्या माध्यमातून उरुळी देवाची, फुरसुगी गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. पुणे महापालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कचरा प्रकल्प या दोन गावांतचपुणे महापालिकेचे उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांत अनेक कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. आता या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन, तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य केले जाईल, असे या गावातील नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEknath Shindeएकनाथ शिंदे