शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पूरग्रस्तांना देणार आठ दिवसांचा शिधा : दीपक म्हैसेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:20 IST

पुणे ,कोल्हापूर महामार्गावरील पाणी ओसरु लागल्याने सोमवारी पाण्याचे टँकर, इंधनाचे ट्रक आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडले.

ठळक मुद्देटूथपेस्ट, मसाल्यापासून विविध ३० वस्तूंचा समावेश

पुणे : पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांना टूथपेस्ट, मसाले, तांदूळ, गहू यासह विविध तीस वस्तूंचा समावेश असलेले जीवनावश्यक आणि दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचे पाकिट दिले जाईल. एका कुटुंबाला किमान आठ दिवस पुरेल इतका शिधा त्यात असेल,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती व मदत कार्याची माहिती त्यांनी दिली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर पातळी धोक्याच्या वर असली तरी पाण्यामधे चांगली घट होत आहे. पुणे ,कोल्हापूर महामार्गावरील पाणी ओसरु लागल्याने सोमवारी पाण्याचे टँकर, इंधनाचे ट्रक आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडले. अजूनही सामान्य वाहतुकीसाठी हा मार्ग खुला केलेला नाही. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्राधान्याने पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. तो पर्यंत टँकर आणि बाटलींबद पाण्याचा पुरवठा केला जाईल. तसेच, स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात येईल. याशिवाय शिबीरातून आपल्या घरी जाणाºया नागरिकांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ आणि दहाकिलोगहू दिले जाईल. शिवाय प्रत्येक कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतके गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी, मसाला असा शिधा, या शिवाय टूथ पेस्ट, ब्लँकेट अशा विविध ३० वस्तूंचे पाकिट देण्यात येईल. एखाद्या कुटुंबात सदस्यांची संख्या अधिक असल्यास, त्यांना त्या प्रमाणात शिधा पाकिटे दिली जातील. बाधित झालेल्या शाळा, सरकारी इमारती, नागरिकांची घरे याचे सर्वेक्षण करण्यात येईल. त्याच्या आधारे नुकसान झालेल्या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच, अनेक मुलांचे वह्या-पुस्तके व शालेय साहित्य पाण्यामुळे खराब झाले आहे. त्यांना शालेय साहित्य दिले जाईल. याशिवाय रस्त्यांची पाहणी करुन तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असल्याचे डॉ. म्हैसेकर म्हणाले. ---नुकसानभरपाईसाठी मृत जनावरांच्या शवविश्चेदनाचा आग्रह नाहीपूरामधे मृत्यू पावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जनावरांच्या शवविश्चेदनाचा आग्रह धरला जाणार नाही. प्रत्येक मृत जनावराचे जीपीएस ट्रॅकींग केले जाईल. त्या आधारे नुकसानभरपाई दिली जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. 

तीन ते चार दिवसांत गावे स्वच्छ केली जातीलपूर ओसरल्यानंतर गावांत आणि शहरी भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, तीन ते चार दिवसांच गावे स्वच्छ केली जातील. त्या साठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासेल. पुणे-पिंपरी चिचंवड महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी सांगली-कोल्हापूरला पाठविण्यात आले आहेत. प्रसंगी लगु मुदतीच्या निविदेद्वारे स्वच्छता कर्मचारी नेमण्यात येतील. 

टॅग्स :PuneपुणेfloodपूरRainपाऊस