शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यातील अडचणीत असणारे सर्व साखर कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न- सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:15 IST

राज्यातील अडचणीत असणारे सर्व साखर कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले...

अवसरी (पुणे) : साखर कारखानदारी हा मोठा उद्योग असून त्या माध्यमातून राज्य सरकारला दरवर्षी ५ हजार कोटी महसूल मिळतो. त्यामुळे राज्यातील अडचणीत असणारे सर्व साखर कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

पारगाव दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहांमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ज्या साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यांना राज्य बँकेने किंवा एनसीडीसी यांनी कर्ज दिल्याने कारखाने सुरू झाले आहेत. जे कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत त्यांच्याकडे तारण ठेवण्यासारखे काही नाही. त्या कारखान्यांना बँकांनी कर्ज दिले नसून या पुढील काळात कुठल्याच साखर कारखान्यांना कर्ज देणार नसल्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे.

या वर्षी उसाचे उत्पादन कमी झाले असून पुढच्या वर्षीही उसाचे उत्पादन घटणार असल्याचे वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भूमिका घेत असून समाजामध्ये अंतर निर्माण होणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSugar factoryसाखर कारखाने