शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:12 IST

जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली.

ठळक मुद्देनारायणगावातील विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, श्री प्रसाद कृषी सेवा केंद्र, बाविस्कर अ‍ॅग्रो दुकानांचा समावेशजुन्नर तालुक्यात राबविलेल्या मोहिमेंतर्गत ४५ कीटकनाशक केंद्रांची करण्यात आली तपासणी

पुणे : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील तीन कृषिविक्री दुकानांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली आहे.राज्य शासनाने बिगर नोंदणीकृत पीक वाढ संजीवकांची विक्री न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नारायणगावातील विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, श्री प्रसाद कृषी सेवा केंद्र आणि बाविस्कर अ‍ॅग्रो दुकानांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ४५ कीटकनाशक केंद्रांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ६ कीटकनाशक उत्पादक कंपनीवर कारवाई उत्पादनांवर विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत. अवैध कीटकनाशकांचा साठा केल्याप्रकरणी सन १९६८ आणि १९७१ अन्वये शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात आल्याचे खैरनार यांनी सांगितले.जिल्ह्यातील विविध कीटकनाशकांच्या दुकानांमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यातील कीटकनाशकांचे उत्पादन साठवणुकीची तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत ३१ कीटकनाशक विक्रीवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्या कीटकनाशकांचे छापील मूल्य ६५, ४९ आणि ६६४ आहे. कीटकनाशकांची विक्री करताना सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध सूत्र प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कीटकनाशकांची विक्री करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कीटकनाशक वापरामुळे शेतकर्‍यांना आणि शेतमजुरांना विषबाधा होणार नाही. याबाबतची दक्षता कृषी विक्री दुकानदारांनी घ्यावयाची आहे. तसेच संबंधित कीटकनाशकांची संपूर्ण माहिती शेतकर्‍यांना देणे बंधनकारक आहे. अशी सूचना जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. विक्री केलेले कीटकनाशक, तसेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारसी केल्याव्यतिरिक्त जादा पिकाची लेबल शिफारस केली आहे. कीटकनाशक मंडळाने दिलेल्या नोंदणी परवानगीचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

 

.. तर परवाना निलंबनाची कारवाई जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कृषी अधिकार्‍यांना कीटकनाशकांची साठवणूक करणार्‍या दुकानदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.तसेच, कीटकनाशक फवारणी करताना शेतकर्‍यांनी घ्यावयाच्या आवश्यक काळजीच्या सूचना दुकानदारांनी देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे