शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

Bull Cart Race: पुणे जिल्ह्यात जत्रा - यात्रांमुळे बैलगाडा शर्यतीची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:24 IST

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुणे : बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात सध्या जिल्ह्यात जत्रा - यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाकडे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठीचे अर्जांची संख्या वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी 16 अर्ज आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पहिली बैलगाडा शर्यत भरविण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व मावळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी असे दोन अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केले होते. राज्य आणि जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत म्हणून प्रचंड जय्यत तयारी देखील केली होती. परंतु दरम्यानच्या काळात पुणे जिल्हा आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली आणि शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील 1 जानेवारी रोजी होणाऱ्या बैलगाडा शर्यतींना स्थगिती दिली. आता आढळराव पाटील आणि सुनिल शेळके यांच्या स्थगिती दिलेल्या बैलगाडा शर्यती 11 आणि 12 फेब्रुवारीला होणार आहे.  त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर जिल्ह्यातील पहिली बारी होणार आहे. 

दरम्यान जिल्ह्यात सध्या जत्रा- यत्रांचा हंगाम सुरू झाला असून,  माघपौर्णिमेला 16 आणि 17 फेब्रुवारी दरम्यान सहा- सात गावांमध्ये खंडोबाची यात्रा भरवली जाते. या सर्व ठिकाणी पारंपारीक पध्दतीनुसार बैलगाड शर्यत आयोजित केली जाते. या सर्व गावांसह अन्य गावांमधून देखील बैलगाड शर्यतसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज आले आहेत. 

जाचक अटी कमी करा व स्थानिक स्तरावर परवानगी द्या 

''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता बैलगाड शर्यतीला परवानगी देण्यात येत असली तरी यासाठी अनेक जाचक अटी घातल्या आहेत. तसेच परवानगीसाठी तहसिलदार,  पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी आठ-दहा दिवस जातात. याशिवाय परवानगीसाठी थेट पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे लहान-मोठ्या गावांना आवघड होऊन बसते. सध्या जिल्ह्यात जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू झाला असून,  या निमित्त पारंपारीक,  नवसाचे बैलगाड पळवले जातात. यासाठी शासनाने या जाचक अटी कमी करून स्थानिक स्तरावर परवानगी देण्याची सोय करावी असे राजेंद्र चव्हाण ( उपाध्यक्ष यात्रा समिती, वडज व गाडा मालक) यांनी सांगितले.''  

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतGovernmentसरकारAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारzpजिल्हा परिषद