शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Bull Cart Race: पुणे जिल्ह्यात जत्रा - यात्रांमुळे बैलगाडा शर्यतीची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:24 IST

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुणे : बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात सध्या जिल्ह्यात जत्रा - यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाकडे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठीचे अर्जांची संख्या वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी 16 अर्ज आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पहिली बैलगाडा शर्यत भरविण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व मावळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी असे दोन अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केले होते. राज्य आणि जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत म्हणून प्रचंड जय्यत तयारी देखील केली होती. परंतु दरम्यानच्या काळात पुणे जिल्हा आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली आणि शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील 1 जानेवारी रोजी होणाऱ्या बैलगाडा शर्यतींना स्थगिती दिली. आता आढळराव पाटील आणि सुनिल शेळके यांच्या स्थगिती दिलेल्या बैलगाडा शर्यती 11 आणि 12 फेब्रुवारीला होणार आहे.  त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर जिल्ह्यातील पहिली बारी होणार आहे. 

दरम्यान जिल्ह्यात सध्या जत्रा- यत्रांचा हंगाम सुरू झाला असून,  माघपौर्णिमेला 16 आणि 17 फेब्रुवारी दरम्यान सहा- सात गावांमध्ये खंडोबाची यात्रा भरवली जाते. या सर्व ठिकाणी पारंपारीक पध्दतीनुसार बैलगाड शर्यत आयोजित केली जाते. या सर्व गावांसह अन्य गावांमधून देखील बैलगाड शर्यतसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज आले आहेत. 

जाचक अटी कमी करा व स्थानिक स्तरावर परवानगी द्या 

''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता बैलगाड शर्यतीला परवानगी देण्यात येत असली तरी यासाठी अनेक जाचक अटी घातल्या आहेत. तसेच परवानगीसाठी तहसिलदार,  पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी आठ-दहा दिवस जातात. याशिवाय परवानगीसाठी थेट पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे लहान-मोठ्या गावांना आवघड होऊन बसते. सध्या जिल्ह्यात जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू झाला असून,  या निमित्त पारंपारीक,  नवसाचे बैलगाड पळवले जातात. यासाठी शासनाने या जाचक अटी कमी करून स्थानिक स्तरावर परवानगी देण्याची सोय करावी असे राजेंद्र चव्हाण ( उपाध्यक्ष यात्रा समिती, वडज व गाडा मालक) यांनी सांगितले.''  

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतGovernmentसरकारAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारzpजिल्हा परिषद