शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

अनुदानामुळे महाकोशाची संकल्पना बारगळणार? स्वयंपूर्ण संमेलनाचे स्वप्न अधुरेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 05:02 IST

साहित्य महामंडळाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वयंपूर्ण करता यावे, यासाठी निर्माण झालेल्या महाकोश निधीची संकल्पनाच बारगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केल्यामुळे महामंडळाचे स्वयंपूर्ण संमेलनाचे स्वप्न अधुरेच राहणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात रंगली आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : साहित्य महामंडळाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वयंपूर्ण करता यावे, यासाठी निर्माण झालेल्या महाकोश निधीची संकल्पनाच बारगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केल्यामुळे महामंडळाचे स्वयंपूर्ण संमेलनाचे स्वप्न अधुरेच राहणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात रंगली आहे.बडोदा येथील साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षीपासून संमेलनाचा निधी ५० लाख रुपये करण्याची घोषणा केली. सध्या महाकोशामध्ये १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. या निधीवरील व्याजाची रक्कम वर्षाला ४८ लाख रुपयांच्यादरम्यान जाते. तेवढाच निधी सरकारकडून मंजूर करण्यात आल्याने महाकोश निधीची संकल्पनाच बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वसुंधरा पेंडसे नाईक १९९९ मध्ये साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना महाकोश निधी संकल्पना अस्तित्वात आली. साहित्य संमेलनाला स्वयंपूर्ण करण्यासाठी संमेलन निधी (महाकोश) उभारावा, असा उद्देश त्यामागे होता. महाकोशामध्ये जमा होणाऱ्या निधीच्या व्याजातून संमेलनाचा खर्च करण्यात यावा, असाही विचार करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून महाकोशासाठी निधी जमवण्याचे काम करण्यात येत होते. महाकोश निधीसाठी रसिक, साहित्यिकांनी भर घालावी, यासाठी डोंबिवलीच्या संमेलनात ५ दानपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक गाळेधारकाने महाकोशाच्या निधीसाठी हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, या योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने बडोदा येथील संमेलनामध्ये ही संकल्पना बारगळली.महाकोश निधीसाठी महामंडळाच्या विश्वस्तांकडून ठोस प्रयत्न करण्यात येत नाहीत, त्यामुळेही निधीमध्ये भर पडत नसल्याचे बोलले जात आहे. निधी वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसतील तर उसने अवसान आणून काय उपयोग, असा सवाल महामंडळाच्याच एका पदाधिकाºयाने उपस्थित केला आहे. संमेलन स्वयंपूर्ण करण्यासाठी महामंडळासह सर्व घटक संस्थांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची खंतही पदाधिकाºयांकडून व्यक्त केली. जानेवारी २०१४ मध्ये महामंडळाच्या एका सभेमध्ये संमेलन निधीचा ठराव विश्वस्त मंडळाने मांडला होता. सरकारी मदतीशिवाय संमेलन निधीच्या व्याजातून संमेलन स्वयंपूर्ण करावे, असे ठरावात नमूद केले होते. तेव्हापासून महाकोशातील निधी वाढवण्यासाठी महामंडळाने, घटक संस्थांनी काय धोरण राबवले, विश्वस्त समितीने काय प्रयत्न केले असे प्रश्न उपस्थित होत असतानाच मराठी माणसाची उदासीनता, भाषिक अस्मितेचा अभाव कारणीभूत आहे, असे मत महामंडळाच्या अध्यक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मदतीचा वेग पाहता पुढील १०० वर्षांत तरी संमेलन स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण होईल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.आपण उगाचच स्वप्न बघतो...संमेलन निधी स्थापनेचा मूळ उद्देश हा साहित्य संमेलन शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय घेता यावे एवढे व्याज दरवर्षी येइल इतका निधी उभारणे हे आहे. मराठी भाषिक समाजाच्या भरवशावर बघितले गेलेले हे स्वप्न ही या समाजाची खरोखरच गरज आहे की आपण उगाच त्याच्या वतीने हे स्वप्न बघतो आहोत, असे वाटावे अशी या निधीची विद्यमान अवस्था आहे.या निधीसाठी इतर समाजघटक तर दूरच पण आपल्या या व्यवहाराशी संबंधित संस्था, लेखक, प्रकाशक, ग्रंथवितरक, शिक्षक, प्राध्यापक, ग्रंथव्यवहारातील लोक, ग्रंथपाल, मराठी रंगभूमीवरील, चित्रपट उद्योगातील नट अशा कितीतरी सबंध घटकांना तरी कुठे या निधीच्या या हेतूपूर्तीची गरज वाटते?मराठी उद्योजक, व्यावसायिक ही तर दूरचीच बाब. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक बाबीची अशी गरज या समाजाला भासण्यासाठी, अशा बाबी त्याच्या अग्रक्रमाच्या होण्यासाठी अजून बराच काळ जावा लागेल असाच याचा अर्थ आहे.- श्रीपाद भालचंद्र जोशी,अध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :Puneपुणे