शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

शासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळे 832 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 17:43 IST

सहाय्यक वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या विराेधात उच्च न्यायालयाचा निकाल गेला असून शासनाने न्यायालयात विद्यार्थ्यांची याेग्य बाजू मांडली नसल्याचा अाराेप विद्यार्थ्यांनी केला अाहे.

पुणे :  सहाय्यक माेटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले असताना उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या कचखाऊ भूमिकेमुळे 832 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले अाहे. ही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच गॅरेजमधील कामाचा अनुभव असणे अावश्यक अाहे. परंतु शासनाने काढलेल्या जाहीरातीत हा परवाना हा कामावर रुजु झाल्यानंतर काढला तरी चालणार असल्याचे तसेच गॅरेजमधील कामाचे प्रशिक्षण हे उमेदवार कामावर रुजू झाल्यानंतर देण्यात येईल असे सांगण्यात अाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे अाहे. उच्च न्यायालयात एका व्यक्तीकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने शासनाने दिलेली सवलत चुकीची ठरवत विद्यार्थ्यांच्या विराेधात निर्णय दिला असून या निर्णयामुळे हे विद्यार्थी परीक्षा पास हाेऊनही त्यांची नियुक्ती हाेऊ शकणार नाही. त्यामुळे शासनाने अध्यादेश काढून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत अाहे. 

    शासनाने उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू याेग्य प्रकारे मांडली नसल्याचा अाराेप विद्यार्थ्यांनी केला अाहे. एमपीएससीद्वारे 30 एप्रिल 2017 राेजी पूर्व परीक्षा घेण्यात अाली हाेती. 6 अाॅगस्ट 2017 ला मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर 31 मार्च 2018 ला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात अाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 832 विद्यार्थ्यांना शिफारस पत्र मिळाली अाहेत. शासनाने तयार केलेल्या नव्या निकषांनुसार जड वाहन चालविण्याचा परवाना हा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काढता येणार हाेता. तसेच गॅरेज कामाबाबतचे प्रशिक्षण शासनाकडून प्राेबेशन कालावधीत देण्यात येणार हाेते. परंतु या नव्या निकषांबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल झाल्याने न्यायालयाने नवे निकष चुकीचे ठरवल्याने 832 विद्यार्थ्यांचे भवितव्य धाेक्यात अाले अाहे. शासनाने विद्यार्थ्यांची याेग्य बाजू न्यायालयात मांडली नसल्याचा अाराेप विद्यार्थ्यांकडून करण्यात अाला अाहे. तसेच शासनाने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांची भरती करावी किंवा सर्वाेच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली अाहे. 

    याबाबत बाेलताना दत्तात्रय शिंदे हा विद्यार्थी म्हणाला, शासनाने मुळात परीक्षा उशीरा घेतली. तसेच एमपीएससीने निकाल लावण्यास उशीर केला. विद्यार्थ्यांनी शासनाने प्रकाशीत केलेल्या जाहीरातीतील निकषांप्रमाणे अर्ज केला हाेता. या परीक्षेत 832 विद्यार्थी उत्तीर्ण झासे असून त्यांना शिफारस पत्र सुद्धा मिळाले अाहे. परंतु शासनाने विद्यार्थ्यांची याेग्य बाजू न्यायालयात न मांडल्याने न्यायालयाचा निर्णय विद्यर्थ्यांच्या विराेधात गेला. वास्तविक शासनाने जाहीर केलेल्या अटी व निकषांनुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यामुळे अाता न्यायालयाने शासनाचे निकष चुकीचे ठरविले तर त्यात विद्यार्थ्यांची काय चूक त्यामुळे शासनाने अध्यादेश काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सेवेत घ्यावे. अथवा सर्वाेच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीGovernmentसरकारCourtन्यायालय