शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

शासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळे 832 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 17:43 IST

सहाय्यक वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या विराेधात उच्च न्यायालयाचा निकाल गेला असून शासनाने न्यायालयात विद्यार्थ्यांची याेग्य बाजू मांडली नसल्याचा अाराेप विद्यार्थ्यांनी केला अाहे.

पुणे :  सहाय्यक माेटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले असताना उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या कचखाऊ भूमिकेमुळे 832 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले अाहे. ही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच गॅरेजमधील कामाचा अनुभव असणे अावश्यक अाहे. परंतु शासनाने काढलेल्या जाहीरातीत हा परवाना हा कामावर रुजु झाल्यानंतर काढला तरी चालणार असल्याचे तसेच गॅरेजमधील कामाचे प्रशिक्षण हे उमेदवार कामावर रुजू झाल्यानंतर देण्यात येईल असे सांगण्यात अाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे अाहे. उच्च न्यायालयात एका व्यक्तीकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने शासनाने दिलेली सवलत चुकीची ठरवत विद्यार्थ्यांच्या विराेधात निर्णय दिला असून या निर्णयामुळे हे विद्यार्थी परीक्षा पास हाेऊनही त्यांची नियुक्ती हाेऊ शकणार नाही. त्यामुळे शासनाने अध्यादेश काढून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत अाहे. 

    शासनाने उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू याेग्य प्रकारे मांडली नसल्याचा अाराेप विद्यार्थ्यांनी केला अाहे. एमपीएससीद्वारे 30 एप्रिल 2017 राेजी पूर्व परीक्षा घेण्यात अाली हाेती. 6 अाॅगस्ट 2017 ला मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर 31 मार्च 2018 ला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात अाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 832 विद्यार्थ्यांना शिफारस पत्र मिळाली अाहेत. शासनाने तयार केलेल्या नव्या निकषांनुसार जड वाहन चालविण्याचा परवाना हा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काढता येणार हाेता. तसेच गॅरेज कामाबाबतचे प्रशिक्षण शासनाकडून प्राेबेशन कालावधीत देण्यात येणार हाेते. परंतु या नव्या निकषांबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल झाल्याने न्यायालयाने नवे निकष चुकीचे ठरवल्याने 832 विद्यार्थ्यांचे भवितव्य धाेक्यात अाले अाहे. शासनाने विद्यार्थ्यांची याेग्य बाजू न्यायालयात मांडली नसल्याचा अाराेप विद्यार्थ्यांकडून करण्यात अाला अाहे. तसेच शासनाने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांची भरती करावी किंवा सर्वाेच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली अाहे. 

    याबाबत बाेलताना दत्तात्रय शिंदे हा विद्यार्थी म्हणाला, शासनाने मुळात परीक्षा उशीरा घेतली. तसेच एमपीएससीने निकाल लावण्यास उशीर केला. विद्यार्थ्यांनी शासनाने प्रकाशीत केलेल्या जाहीरातीतील निकषांप्रमाणे अर्ज केला हाेता. या परीक्षेत 832 विद्यार्थी उत्तीर्ण झासे असून त्यांना शिफारस पत्र सुद्धा मिळाले अाहे. परंतु शासनाने विद्यार्थ्यांची याेग्य बाजू न्यायालयात न मांडल्याने न्यायालयाचा निर्णय विद्यर्थ्यांच्या विराेधात गेला. वास्तविक शासनाने जाहीर केलेल्या अटी व निकषांनुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यामुळे अाता न्यायालयाने शासनाचे निकष चुकीचे ठरविले तर त्यात विद्यार्थ्यांची काय चूक त्यामुळे शासनाने अध्यादेश काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सेवेत घ्यावे. अथवा सर्वाेच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीGovernmentसरकारCourtन्यायालय