शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत, शेतकऱ्यांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 00:41 IST

शेतकऱ्यांची धांदल : दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी जोरदार वृष्टी

चाकण : दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सोमवारी तब्बल अर्धा तास ते पाऊण तास चाकण परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. शेतात सोयाबीन काढणी सुरु असल्याने सोयाबीन झाकण्यासाठी शेतकºयांची त्रेधातिरपीट झाली. पुणे-नाशिक महामार्गावर परतीच्या पावसाने पाणीच पाणी झाले होते. चाकण व परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे झेंडू, शेवंती, अष्टरच्या फुलांना फटका बसणार आहे. फुले भिजून खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाने फुले खराब झाल्यास दसºयाला झेंडू भाव खाईल, अशी शक्यता शेतकºयांनी वर्तवली आहे.एकीकडे पुण्यातील काही तालुक्यात पावसाने थैमान मांडले आहे. तर दुसरीकडे इंदापूर सारख्या तालुक्यात पावस पडत नसल्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहे.पावसाबरोबर सुसाट वारा व वीज पडत असल्यामळे अनेक नुकसान होत आहे. कोठे रस्त्यावर झाडे पडत आहे, तर कोठे वीज पडल्याने कोणाचा तरी मृत्यू होत आहे. एकंदर पावसाने जिल्ह््यात थैमान मांडले आहे.४गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्याची आतुरतेने वाट पाहत होता. परंतु अशा सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे.परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे कडक उन्हानंतर आलेल्या पावसामुळे नागरिक सुखावला आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा घराच्या छतावर लोक मनमुराद भिजत आहेत.इंदापूर तालुक्यात पावसासाठी नृसिंहाला साकडेबावडा : इंदापूर तालुक्यात पावसाअभावी सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसाकडे लागून राहिलेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यावर वरुणराजाने कृपा करावी, असे साकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज श्री लक्ष्मी-नृसिंहास घातले आहे. श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेतले. पावसाअभावी इंदापूर तालुक्यात सध्या उन्हाळ्यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जर परतीचा पाऊस हा झाला नाही तर मात्र आगामी काळात शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस हा धो धो पडणे अतिशय गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच विलास ताटे देशमुख, नीरा भीमा कारखान्याचे संचालक प्रकाशराव मोहिते, पोलीसपाटील अभय वाकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष दशरथ राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस