शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत, शेतकऱ्यांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 00:41 IST

शेतकऱ्यांची धांदल : दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी जोरदार वृष्टी

चाकण : दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सोमवारी तब्बल अर्धा तास ते पाऊण तास चाकण परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. शेतात सोयाबीन काढणी सुरु असल्याने सोयाबीन झाकण्यासाठी शेतकºयांची त्रेधातिरपीट झाली. पुणे-नाशिक महामार्गावर परतीच्या पावसाने पाणीच पाणी झाले होते. चाकण व परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे झेंडू, शेवंती, अष्टरच्या फुलांना फटका बसणार आहे. फुले भिजून खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाने फुले खराब झाल्यास दसºयाला झेंडू भाव खाईल, अशी शक्यता शेतकºयांनी वर्तवली आहे.एकीकडे पुण्यातील काही तालुक्यात पावसाने थैमान मांडले आहे. तर दुसरीकडे इंदापूर सारख्या तालुक्यात पावस पडत नसल्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहे.पावसाबरोबर सुसाट वारा व वीज पडत असल्यामळे अनेक नुकसान होत आहे. कोठे रस्त्यावर झाडे पडत आहे, तर कोठे वीज पडल्याने कोणाचा तरी मृत्यू होत आहे. एकंदर पावसाने जिल्ह््यात थैमान मांडले आहे.४गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्याची आतुरतेने वाट पाहत होता. परंतु अशा सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे.परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे कडक उन्हानंतर आलेल्या पावसामुळे नागरिक सुखावला आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा घराच्या छतावर लोक मनमुराद भिजत आहेत.इंदापूर तालुक्यात पावसासाठी नृसिंहाला साकडेबावडा : इंदापूर तालुक्यात पावसाअभावी सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसाकडे लागून राहिलेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यावर वरुणराजाने कृपा करावी, असे साकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज श्री लक्ष्मी-नृसिंहास घातले आहे. श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेतले. पावसाअभावी इंदापूर तालुक्यात सध्या उन्हाळ्यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जर परतीचा पाऊस हा झाला नाही तर मात्र आगामी काळात शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस हा धो धो पडणे अतिशय गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच विलास ताटे देशमुख, नीरा भीमा कारखान्याचे संचालक प्रकाशराव मोहिते, पोलीसपाटील अभय वाकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष दशरथ राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस