शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Supriya Sule: केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांचं दिवाळं काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 20:57 IST

केंद्र सरकारच्या ढसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार

धनकवडी : कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून या संकटातून अर्थव्यवस्था सावरली असली तरी वाढत्या महागाईने ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे दिवाळं काढलं आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे. हे सरकार देशात आणखी काही काळ राहिले तर आपल्या मुलांना दिवाळीचा फराळ मोबाईल मध्ये दाखवावा लागेल अशी टिका खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केली.

शारदा फौंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने आंबेगाव येथील जांभूळवाडी तलाव परिसरात नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश वनशिव व प्रिया वनशिव यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुळे बोलत होत्या.

''संसदेत तरुणांच्या बेरोजगारीचा व महागाईचा प्रश्न मांडणार आहे. महापालिका परत मिळविण्याच्या विचाराने नागरिकांनी येत्या पालिका निवडणुकीत आपला लोकप्रतिनिधी निवडावा असे त्यांनी यावेळी सांगितले.'' 

केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे

आर्यन खानकडे  काहीच मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय? त्यामुळे समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारले जाते. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलीवूडचे आणि देशाचे नाव एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास जगभरात बदनाम होते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार