शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील अठरा हजाराहून अधिक हेक्टर शेती क्षेत्रं झालं बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:09 IST

पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम हाेणार असून नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र बाधीत झाले अाहे.

पुणे: पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. तर नांदेड,नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी व पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस,सोयाबीन,भात,मुग,तूर,ज्वारी बाजरी आदी पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाने प्रसिध्द केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.तसेच राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे.

    राज्याच्या कृषी विभागातर्फे १ जून ते २४ आॅगस्ट या कालावधीचा खरीप हंगामाचा कृषी पिक पेरणी व पिक परिस्थितीचा अहवाल अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात ऊस वगळून १३४.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर (९६ टक्के)पेरणी व लागवड झाली आहे. नाशिक, औरंगाबाद ,अहमदनगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, सातारा, सांगली जिल्ह्यात काही तालुक्यात पावसात खंड पडला आहे. तसेच काही भागात किड व रोगाचा प्रादूर्भाव झाला असल्याचे कृषी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

     नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यात रोपवाटीकेतील रोपांचे आयुर्मान जास्त झाल्यामुळे भात पिकाच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे. तसेच पावसातील खंडामुळे उडीद ,मुग व जिरायत कापूस पिकांच्या उत्पादकतेत घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. धुळे, नंदरबार व जळगाव जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून कमी पर्जन्यमानामुळे सातारा  जिल्ह्यातील बाजरी पिकाची वाढ खुंटली आहे. तर सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात पावसआभावी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.मात्र,पुणे विभागात अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिक स्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होत आहे.

    दरम्यान,औरंगाबाद जिल्हातील काही तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे कापूस,मका व मुग पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. बीड व जालना जिल्ह्यात काही तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. या उलट नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व मुक पिके पिवळी पडू लागली आहेत. पावसाचा खंड पडल्याने अमरावती विभागातील हलक्या जमिनीमधील सोयाबीन पिकात फूल गळ झालेली दिसून येते,असेही कृषी अहवालात नमूद केले आहे.

कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव राज्यात कापूस पिका खाली २६ जिल्हे असून एकूण २० हजार १६० गावामध्ये कापूस पिकाची पेरणी झालेली आहे.त्यापैकी १६ ते २२ आॅगस्ट या कालावधीत ५ हजार ३०३ (२६ टक्के)गावांमध्ये कीड व रोगासाठी सर्वेक्षण करण्यात आले.गेल्या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात बोंडअळीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर अढळून आलेली आहे.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र