शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील अठरा हजाराहून अधिक हेक्टर शेती क्षेत्रं झालं बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:09 IST

पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम हाेणार असून नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र बाधीत झाले अाहे.

पुणे: पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. तर नांदेड,नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी व पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस,सोयाबीन,भात,मुग,तूर,ज्वारी बाजरी आदी पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाने प्रसिध्द केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.तसेच राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे.

    राज्याच्या कृषी विभागातर्फे १ जून ते २४ आॅगस्ट या कालावधीचा खरीप हंगामाचा कृषी पिक पेरणी व पिक परिस्थितीचा अहवाल अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात ऊस वगळून १३४.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर (९६ टक्के)पेरणी व लागवड झाली आहे. नाशिक, औरंगाबाद ,अहमदनगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, सातारा, सांगली जिल्ह्यात काही तालुक्यात पावसात खंड पडला आहे. तसेच काही भागात किड व रोगाचा प्रादूर्भाव झाला असल्याचे कृषी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

     नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यात रोपवाटीकेतील रोपांचे आयुर्मान जास्त झाल्यामुळे भात पिकाच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे. तसेच पावसातील खंडामुळे उडीद ,मुग व जिरायत कापूस पिकांच्या उत्पादकतेत घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. धुळे, नंदरबार व जळगाव जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून कमी पर्जन्यमानामुळे सातारा  जिल्ह्यातील बाजरी पिकाची वाढ खुंटली आहे. तर सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात पावसआभावी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.मात्र,पुणे विभागात अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिक स्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होत आहे.

    दरम्यान,औरंगाबाद जिल्हातील काही तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे कापूस,मका व मुग पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. बीड व जालना जिल्ह्यात काही तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. या उलट नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व मुक पिके पिवळी पडू लागली आहेत. पावसाचा खंड पडल्याने अमरावती विभागातील हलक्या जमिनीमधील सोयाबीन पिकात फूल गळ झालेली दिसून येते,असेही कृषी अहवालात नमूद केले आहे.

कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव राज्यात कापूस पिका खाली २६ जिल्हे असून एकूण २० हजार १६० गावामध्ये कापूस पिकाची पेरणी झालेली आहे.त्यापैकी १६ ते २२ आॅगस्ट या कालावधीत ५ हजार ३०३ (२६ टक्के)गावांमध्ये कीड व रोगासाठी सर्वेक्षण करण्यात आले.गेल्या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात बोंडअळीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर अढळून आलेली आहे.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र