शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विषमतेमुळे लोकशाही रुजवणे कठीण : जाधव

By admin | Updated: February 23, 2017 02:06 IST

भारतीय समाजरचना विषमतेवर आधारलेली आहे, याचा आविष्कार जातिव्यवस्थेतून दिसतो

मंचर : भारतीय समाजरचना विषमतेवर आधारलेली आहे, याचा आविष्कार जातिव्यवस्थेतून दिसतो. परंपरागत असे स्वरूप व उच्च-नीचतेची भावना ही यांची वैशिष्ट्ये. अशा विषमतापूर्ण समाजात लोकशाही रुजवण्याचे फार मोठे आव्हान आपल्यासमोर होते व आहे, असे मत घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव यांनी व्यक्त केले.मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रौढ निरंतर शिक्षण व ज्ञानविस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लोकशाही या विषयावर अर्धदिवसीय कृती सत्राचे आयोजन केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड होते. या वेळी व्यासपीठावर घोडेगाव वकील संघटनेचे खजिनदार अ‍ॅड. नवनाथ निघोट, डॉ. लक्ष्मणराव घोलप, प्रा. तानसेन रणदिवे उपस्थित होते. कृती सत्रातील दुसऱ्या सत्रात बोलताना अ‍ॅड. नवनाथ निघोट लोकशाहीचे सामर्थ्य व सद्यस्थिती विषयी म्हणाले, लोकशाही राज्यात व्यक्तीच्या हक्कांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकशाहीचे यशापयश त्या देशातील लोकांना किती स्वातंत्र्य आहे, यावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक लोकशाही राज्यात, देशात स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल, असे वातावरण निर्माण करण्याबरोबर त्यांच्या कर्तव्याची जाणीवही वेळोवेळी करून देणे, असणे हे लोकशाही खोलपर्यंत रुजविण्याचे प्रमुख तत्त्व आहे. प्रास्ताविक प्रा. ताणसेन रणदिवे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. भाऊसाहेब सांगळे व प्रा. वैशाली सुपेकर यांनी केले. आभार प्रा. संतोष जाधव यांनी मानले. प्रा. गणेश आवारी, प्रा. एस. व्ही. पिंजारी, प्रा. सचिन मोरे यांनी नियोजन केले.प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, भारतीय समाज केवळ विविधतापूर्ण असे नाही तर तो विषमतेवर आधारलेला आहे. कृती सत्राच्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सुमरे ८० विद्यार्थ्यांन उत्स्फूर्त सहभाग घेतला.