शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

विषमतेमुळे लोकशाही रुजवणे कठीण : जाधव

By admin | Updated: February 23, 2017 02:06 IST

भारतीय समाजरचना विषमतेवर आधारलेली आहे, याचा आविष्कार जातिव्यवस्थेतून दिसतो

मंचर : भारतीय समाजरचना विषमतेवर आधारलेली आहे, याचा आविष्कार जातिव्यवस्थेतून दिसतो. परंपरागत असे स्वरूप व उच्च-नीचतेची भावना ही यांची वैशिष्ट्ये. अशा विषमतापूर्ण समाजात लोकशाही रुजवण्याचे फार मोठे आव्हान आपल्यासमोर होते व आहे, असे मत घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव यांनी व्यक्त केले.मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रौढ निरंतर शिक्षण व ज्ञानविस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लोकशाही या विषयावर अर्धदिवसीय कृती सत्राचे आयोजन केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड होते. या वेळी व्यासपीठावर घोडेगाव वकील संघटनेचे खजिनदार अ‍ॅड. नवनाथ निघोट, डॉ. लक्ष्मणराव घोलप, प्रा. तानसेन रणदिवे उपस्थित होते. कृती सत्रातील दुसऱ्या सत्रात बोलताना अ‍ॅड. नवनाथ निघोट लोकशाहीचे सामर्थ्य व सद्यस्थिती विषयी म्हणाले, लोकशाही राज्यात व्यक्तीच्या हक्कांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकशाहीचे यशापयश त्या देशातील लोकांना किती स्वातंत्र्य आहे, यावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक लोकशाही राज्यात, देशात स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल, असे वातावरण निर्माण करण्याबरोबर त्यांच्या कर्तव्याची जाणीवही वेळोवेळी करून देणे, असणे हे लोकशाही खोलपर्यंत रुजविण्याचे प्रमुख तत्त्व आहे. प्रास्ताविक प्रा. ताणसेन रणदिवे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. भाऊसाहेब सांगळे व प्रा. वैशाली सुपेकर यांनी केले. आभार प्रा. संतोष जाधव यांनी मानले. प्रा. गणेश आवारी, प्रा. एस. व्ही. पिंजारी, प्रा. सचिन मोरे यांनी नियोजन केले.प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, भारतीय समाज केवळ विविधतापूर्ण असे नाही तर तो विषमतेवर आधारलेला आहे. कृती सत्राच्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सुमरे ८० विद्यार्थ्यांन उत्स्फूर्त सहभाग घेतला.