शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

विषमतेमुळे लोकशाही रुजवणे कठीण : जाधव

By admin | Updated: February 23, 2017 02:06 IST

भारतीय समाजरचना विषमतेवर आधारलेली आहे, याचा आविष्कार जातिव्यवस्थेतून दिसतो

मंचर : भारतीय समाजरचना विषमतेवर आधारलेली आहे, याचा आविष्कार जातिव्यवस्थेतून दिसतो. परंपरागत असे स्वरूप व उच्च-नीचतेची भावना ही यांची वैशिष्ट्ये. अशा विषमतापूर्ण समाजात लोकशाही रुजवण्याचे फार मोठे आव्हान आपल्यासमोर होते व आहे, असे मत घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव यांनी व्यक्त केले.मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रौढ निरंतर शिक्षण व ज्ञानविस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लोकशाही या विषयावर अर्धदिवसीय कृती सत्राचे आयोजन केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड होते. या वेळी व्यासपीठावर घोडेगाव वकील संघटनेचे खजिनदार अ‍ॅड. नवनाथ निघोट, डॉ. लक्ष्मणराव घोलप, प्रा. तानसेन रणदिवे उपस्थित होते. कृती सत्रातील दुसऱ्या सत्रात बोलताना अ‍ॅड. नवनाथ निघोट लोकशाहीचे सामर्थ्य व सद्यस्थिती विषयी म्हणाले, लोकशाही राज्यात व्यक्तीच्या हक्कांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकशाहीचे यशापयश त्या देशातील लोकांना किती स्वातंत्र्य आहे, यावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक लोकशाही राज्यात, देशात स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल, असे वातावरण निर्माण करण्याबरोबर त्यांच्या कर्तव्याची जाणीवही वेळोवेळी करून देणे, असणे हे लोकशाही खोलपर्यंत रुजविण्याचे प्रमुख तत्त्व आहे. प्रास्ताविक प्रा. ताणसेन रणदिवे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. भाऊसाहेब सांगळे व प्रा. वैशाली सुपेकर यांनी केले. आभार प्रा. संतोष जाधव यांनी मानले. प्रा. गणेश आवारी, प्रा. एस. व्ही. पिंजारी, प्रा. सचिन मोरे यांनी नियोजन केले.प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, भारतीय समाज केवळ विविधतापूर्ण असे नाही तर तो विषमतेवर आधारलेला आहे. कृती सत्राच्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सुमरे ८० विद्यार्थ्यांन उत्स्फूर्त सहभाग घेतला.