शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:36 IST

आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना लवकरात लवकर पाण्याची सोय करून देण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.येथील तांबेवस्ती, रांजणगाव सांडस परिसरातील कामठेवाडी, शिंदेवस्ती, पठार भाग आंधळगाव, न्हनावरे, उरळगाव, कोळपेवस्ती त्याचप्रमाणे नागरगावचा काही भाग या भागांमध्ये दुष्काळाची दाहकता खूप वाढलेले भागात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.आलेगाव पागामध्ये पाणी साठवण्याची शेंडगेवाडी तलाव तांबेवस्ती तलाव तीन वर्षांपूर्वी आटल्यामुळे या भागात जनावरांच्या व शेतीच्या पिण्याचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात दिवसाकाठी दहा ते बारा बोअरवेल घेऊन पूर्णपणे बोअरवेलचा धुरळा निघालेला असून हिवाळ्यात पिकांचा उन्हाळा झालेला आहे. शेतातील पिके दिवाळीनंतरच संपलेली असून या भागात पिके पाहायला मिळत नाही.एका बोरवेल साठी साधारणपणे दोनशे ते तीनशे फुटापर्यंत पंचवीस ते सव्वीस हजार रुपये खर्च येत आहे 70 रुपये ते 65 रुपये फूट या दराप्रमाणे बोरवेल मशीन चे एजेंट शेतकरी वर्गाकडून पैसे उकळत असल्याची वस्तुस्थिती आहे साधारणपणे पै पाहुण्याकडून पैसे गोळा करून शेतकरी आपल्या शेतामध्ये बोरवेल घेत आहे परंतु पाणी न लागल्यामुळे शेतक?्यांच्या डोक्?यावर कजार्चा डोंगर अजूनही मोठा होता आधीच पिके जळून गेल्याने सोसायटी कर्ज व इतर कडून घेतलेले पैसे यांचाही डोंगर वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला असून या भागामध्ये चासकमानचे आवर्तन लोकप्रतिनिधींनी सोडले तर या भागात दुष्काळाची दाहकता कमी होऊ शकते.आलेगाव पागा परिसरात दिवसाकाठी एक-दोन बोअरवेल होत असून या बोअरवेल पूर्णपणे रिकामा जात आहे. पाण्याची पातळी खालावलेली असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. या भागामध्ये तसेच शिरूरच्या पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये बोअरवेल मशीन पाणी पाहणारा पाणाड्या शेतकरी आणि धुरळा हे समीकरणच जणू जुळलेले दिसत आहे. पाणी लागत नाही व शेतकरी बोअर घेतल्याशिवाय राहत नाही. बोअर केल्यानंतर शेतकºयाला वीस ते पंचवीस हजार रुपयांचा या दुष्काळाच्या परिस्थितीतही कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता मोठी असून लोकप्रतिनिधींनी पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, ही नागरिकांची मागणी आहे.उरळगाव ,नावरे कोळपे वस्ती या परिसरात चासकमान च्या पाण्याचे आवर्तन येऊन गेल्यामुळे विहिरी बोरवेल यांच्या पाण्यासाठी थोडीशी वाढ झालेले आहे परंतु जानेवारीनंतर या भागात टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते- अशोक कोळपे, युवा शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे