शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:36 IST

आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना लवकरात लवकर पाण्याची सोय करून देण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.येथील तांबेवस्ती, रांजणगाव सांडस परिसरातील कामठेवाडी, शिंदेवस्ती, पठार भाग आंधळगाव, न्हनावरे, उरळगाव, कोळपेवस्ती त्याचप्रमाणे नागरगावचा काही भाग या भागांमध्ये दुष्काळाची दाहकता खूप वाढलेले भागात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.आलेगाव पागामध्ये पाणी साठवण्याची शेंडगेवाडी तलाव तांबेवस्ती तलाव तीन वर्षांपूर्वी आटल्यामुळे या भागात जनावरांच्या व शेतीच्या पिण्याचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात दिवसाकाठी दहा ते बारा बोअरवेल घेऊन पूर्णपणे बोअरवेलचा धुरळा निघालेला असून हिवाळ्यात पिकांचा उन्हाळा झालेला आहे. शेतातील पिके दिवाळीनंतरच संपलेली असून या भागात पिके पाहायला मिळत नाही.एका बोरवेल साठी साधारणपणे दोनशे ते तीनशे फुटापर्यंत पंचवीस ते सव्वीस हजार रुपये खर्च येत आहे 70 रुपये ते 65 रुपये फूट या दराप्रमाणे बोरवेल मशीन चे एजेंट शेतकरी वर्गाकडून पैसे उकळत असल्याची वस्तुस्थिती आहे साधारणपणे पै पाहुण्याकडून पैसे गोळा करून शेतकरी आपल्या शेतामध्ये बोरवेल घेत आहे परंतु पाणी न लागल्यामुळे शेतक?्यांच्या डोक्?यावर कजार्चा डोंगर अजूनही मोठा होता आधीच पिके जळून गेल्याने सोसायटी कर्ज व इतर कडून घेतलेले पैसे यांचाही डोंगर वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला असून या भागामध्ये चासकमानचे आवर्तन लोकप्रतिनिधींनी सोडले तर या भागात दुष्काळाची दाहकता कमी होऊ शकते.आलेगाव पागा परिसरात दिवसाकाठी एक-दोन बोअरवेल होत असून या बोअरवेल पूर्णपणे रिकामा जात आहे. पाण्याची पातळी खालावलेली असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. या भागामध्ये तसेच शिरूरच्या पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये बोअरवेल मशीन पाणी पाहणारा पाणाड्या शेतकरी आणि धुरळा हे समीकरणच जणू जुळलेले दिसत आहे. पाणी लागत नाही व शेतकरी बोअर घेतल्याशिवाय राहत नाही. बोअर केल्यानंतर शेतकºयाला वीस ते पंचवीस हजार रुपयांचा या दुष्काळाच्या परिस्थितीतही कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता मोठी असून लोकप्रतिनिधींनी पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, ही नागरिकांची मागणी आहे.उरळगाव ,नावरे कोळपे वस्ती या परिसरात चासकमान च्या पाण्याचे आवर्तन येऊन गेल्यामुळे विहिरी बोरवेल यांच्या पाण्यासाठी थोडीशी वाढ झालेले आहे परंतु जानेवारीनंतर या भागात टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते- अशोक कोळपे, युवा शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे