शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:36 IST

आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना लवकरात लवकर पाण्याची सोय करून देण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.येथील तांबेवस्ती, रांजणगाव सांडस परिसरातील कामठेवाडी, शिंदेवस्ती, पठार भाग आंधळगाव, न्हनावरे, उरळगाव, कोळपेवस्ती त्याचप्रमाणे नागरगावचा काही भाग या भागांमध्ये दुष्काळाची दाहकता खूप वाढलेले भागात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.आलेगाव पागामध्ये पाणी साठवण्याची शेंडगेवाडी तलाव तांबेवस्ती तलाव तीन वर्षांपूर्वी आटल्यामुळे या भागात जनावरांच्या व शेतीच्या पिण्याचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात दिवसाकाठी दहा ते बारा बोअरवेल घेऊन पूर्णपणे बोअरवेलचा धुरळा निघालेला असून हिवाळ्यात पिकांचा उन्हाळा झालेला आहे. शेतातील पिके दिवाळीनंतरच संपलेली असून या भागात पिके पाहायला मिळत नाही.एका बोरवेल साठी साधारणपणे दोनशे ते तीनशे फुटापर्यंत पंचवीस ते सव्वीस हजार रुपये खर्च येत आहे 70 रुपये ते 65 रुपये फूट या दराप्रमाणे बोरवेल मशीन चे एजेंट शेतकरी वर्गाकडून पैसे उकळत असल्याची वस्तुस्थिती आहे साधारणपणे पै पाहुण्याकडून पैसे गोळा करून शेतकरी आपल्या शेतामध्ये बोरवेल घेत आहे परंतु पाणी न लागल्यामुळे शेतक?्यांच्या डोक्?यावर कजार्चा डोंगर अजूनही मोठा होता आधीच पिके जळून गेल्याने सोसायटी कर्ज व इतर कडून घेतलेले पैसे यांचाही डोंगर वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला असून या भागामध्ये चासकमानचे आवर्तन लोकप्रतिनिधींनी सोडले तर या भागात दुष्काळाची दाहकता कमी होऊ शकते.आलेगाव पागा परिसरात दिवसाकाठी एक-दोन बोअरवेल होत असून या बोअरवेल पूर्णपणे रिकामा जात आहे. पाण्याची पातळी खालावलेली असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. या भागामध्ये तसेच शिरूरच्या पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये बोअरवेल मशीन पाणी पाहणारा पाणाड्या शेतकरी आणि धुरळा हे समीकरणच जणू जुळलेले दिसत आहे. पाणी लागत नाही व शेतकरी बोअर घेतल्याशिवाय राहत नाही. बोअर केल्यानंतर शेतकºयाला वीस ते पंचवीस हजार रुपयांचा या दुष्काळाच्या परिस्थितीतही कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता मोठी असून लोकप्रतिनिधींनी पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, ही नागरिकांची मागणी आहे.उरळगाव ,नावरे कोळपे वस्ती या परिसरात चासकमान च्या पाण्याचे आवर्तन येऊन गेल्यामुळे विहिरी बोरवेल यांच्या पाण्यासाठी थोडीशी वाढ झालेले आहे परंतु जानेवारीनंतर या भागात टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते- अशोक कोळपे, युवा शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे