शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पावसाअभावी ५ जिल्हे दुष्काळाच्या छायेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 06:11 IST

निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़

पुणे : निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़कोकणात सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस झाला़ ठाणे व पालघर येथे सरासरीपेक्षा ३६ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ५ टक्के पाऊस जास्त झाला, पण धुळे, जळगाव, नंदूरबार, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत प्रमाण कमी आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे़ विदर्भात ४ टक्के पाऊस जास्त झाला असला, तरी अमरावती, बुलडाणा, वर्धा या ३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़जुलैमध्ये राज्यात अनेक भागांत पावसामध्ये खंड पडल्याने पिकाला ताण आला आहे़ या पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस पडला नाही, तर अनेक ठिकाणी उगवलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे़>या जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग१ जून ते ३ आॅगस्ट या काळातील पाऊस पाहता, नंदूरबार, जालना, बुलडाणा, औरंगाबाद, सांगली जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यल्प असून, आतापर्यंतचे प्रमाण लक्षात घेता, तेथे दुष्काळसदृश्य स्थिती दिसत आहे. औरंगाबाद येथे सरासरीपेक्षा ३४ टक्के, जालना येथे ३३ टक्के, नंदूरबार येथे ३० टक्के, बुलडाणा येथे २७ टक्के आणि सांगली येथे २७ टक्के इतका पाऊस कमी झाला आहे़पाऊस लांबल्यास परिस्थिती चिंताजनकजिल्ह्यांच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले, तर काही तालुक्यांमध्ये ते कमी असते़ पुढील दोन आठवड्यांत पावसाचे प्रमाण कमी असेल़ सध्याचा खंड वाढल्यास जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्या दृष्टीने पिकांच्या पाण्याचे नियोजन आता करण्याची आवश्यकता आहे़ दोन आठवडे कोरडे गेल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते़- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :droughtदुष्काळ