शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

पावसाअभावी ५ जिल्हे दुष्काळाच्या छायेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 06:11 IST

निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़

पुणे : निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़कोकणात सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस झाला़ ठाणे व पालघर येथे सरासरीपेक्षा ३६ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ५ टक्के पाऊस जास्त झाला, पण धुळे, जळगाव, नंदूरबार, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत प्रमाण कमी आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे़ विदर्भात ४ टक्के पाऊस जास्त झाला असला, तरी अमरावती, बुलडाणा, वर्धा या ३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़जुलैमध्ये राज्यात अनेक भागांत पावसामध्ये खंड पडल्याने पिकाला ताण आला आहे़ या पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस पडला नाही, तर अनेक ठिकाणी उगवलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे़>या जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग१ जून ते ३ आॅगस्ट या काळातील पाऊस पाहता, नंदूरबार, जालना, बुलडाणा, औरंगाबाद, सांगली जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यल्प असून, आतापर्यंतचे प्रमाण लक्षात घेता, तेथे दुष्काळसदृश्य स्थिती दिसत आहे. औरंगाबाद येथे सरासरीपेक्षा ३४ टक्के, जालना येथे ३३ टक्के, नंदूरबार येथे ३० टक्के, बुलडाणा येथे २७ टक्के आणि सांगली येथे २७ टक्के इतका पाऊस कमी झाला आहे़पाऊस लांबल्यास परिस्थिती चिंताजनकजिल्ह्यांच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले, तर काही तालुक्यांमध्ये ते कमी असते़ पुढील दोन आठवड्यांत पावसाचे प्रमाण कमी असेल़ सध्याचा खंड वाढल्यास जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्या दृष्टीने पिकांच्या पाण्याचे नियोजन आता करण्याची आवश्यकता आहे़ दोन आठवडे कोरडे गेल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते़- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :droughtदुष्काळ