शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

नाले वळविल्याने बांधकामे धोक्यात

By admin | Updated: August 8, 2016 01:53 IST

शहरातील नाले वळवून बांधकाम करण्यात आल्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून त्यामुळे सोसायट्यांच्या भिंती कोसळणे

पुणे : शहरातील नाले वळवून बांधकाम करण्यात आल्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून त्यामुळे सोसायट्यांच्या भिंती कोसळणे, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नाला वळविण्याचे इतके दुष्परिणाम दिसून येत असतानाही पुन्हा नाल्यांचा प्रवाह वळवून बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रशासनाने धाव घेतली आहे. प्रवाहातून बाहेर पडलेल्या या पाण्यामुळे आजूबाजूच्या सोसायट्यांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सिंहगड रस्त्याच्या कौटिल्य सोसायटीच्या जवळून वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे त्या सोसायटीची संरक्षक भिंत पडली आहे. यापूर्वी तेथील आसपासच्या सोसायट्यांच्या भिंतीही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. धानोरी येथील नाल्याचे पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये शिरत आहे. बिबवेवाडी, कात्रज, मुंढवा येथील नाल्याच्या परिसरात नागरिकांना या समस्येला सातत्याने सामोरे जावे लागत आहे.प्रायमूव्ह संस्थेने शहरातील नाल्यांचे अस्तित्व, लांबी, रूंदी यांचा सर्व्हे करून त्यांची निश्चिती केली आहे. मात्र आता या संस्थेचेच ना-हरकत पत्र जोडून बांधकामासाठी नाला वळविण्याची परवानगी मागितली जात आहे. नाले वळविल्यामुळे संरक्षक भिंती कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे हा निसर्गाकडून धडा मिळाला आहे. तो वेळीच ओळखून पालिकेने नाले वळविण्याच्या धोरणात बदल करण्याची आवश्यकता आहे.1नगरसेवक अजय तायडे यांच्या पुढाकारानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व नाल्यांची पाहणी करून एक अहवाल मुख्यसभेला सादर केला. त्यामध्ये अनेक ठिकाणी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचे, नाला ९० अंशात वळविल्याचे तसेच बंदिस्त केल्याचे आढळून आले होते. सध्याच्या नाले वळविण्याच्या दुष्परिणामाबाबत अजय तायडे यांनी सांगितले, ‘‘नैसर्गिक नाले वळविल्यास त्याचे परिणाम काय होतील याची एक झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. आता जर आपले डोळे उघडले नाहीत तर आपल्याला डोळे बंद करावे लागतील.’’ 2शहरातील कोणताही नाला वळवून बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये असा ठराव मुख्य सभेमध्ये २० मे २०१४ रोजी एकमताने घेतला आहे. मात्र हा प्रस्ताव राज्य शासनाने विखंडित करावा यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाकडे धाव घेतली आहे. राज्य शासनाच्या दरबारी हा विषय सध्या प्रलंबित आहे. नव्याने नाला वळविण्यास मान्यता मिळावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांचे १५०पेक्षा जास्त प्रस्ताव पालिकेकडे दाखल झाले आहेत. राज्य शासनाने मुख्यसभेचा ठराव विखंडित केल्यास या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याचा धोका आहे.